पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीला उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

  145

पुणे : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय. सध्या पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना पुण्यातच आणखी एक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (१५) मुलीने मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होती. आणखी गंभीर बाब म्हणजे तिच्यासोबत तिचे वडीलही सोबतीला होते. मालवाहतूक टेम्पो घेऊन जात असताना सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगात चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असणारा महिंद्र बांडे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मालवाहू पिकअपने दुचाकीसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेले. इतकेच नव्हे तर अपघात झाल्यानंतर पीडितांची मदत न करता त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.


दरम्यान, याप्रकरणी मयत मेमाणे यांचा भाऊ सतीश मेमाणे यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून आरोपी अल्पवयीन मुलीसह तिचे वडील संतोष लेंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिक्रापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या