पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीला उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय. सध्या पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना पुण्यातच आणखी एक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (१५) मुलीने मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होती. आणखी गंभीर बाब म्हणजे तिच्यासोबत तिचे वडीलही सोबतीला होते. मालवाहतूक टेम्पो घेऊन जात असताना सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगात चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असणारा महिंद्र बांडे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मालवाहू पिकअपने दुचाकीसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेले. इतकेच नव्हे तर अपघात झाल्यानंतर पीडितांची मदत न करता त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.


दरम्यान, याप्रकरणी मयत मेमाणे यांचा भाऊ सतीश मेमाणे यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून आरोपी अल्पवयीन मुलीसह तिचे वडील संतोष लेंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिक्रापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री