पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीला उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यात नेमकं चाललंय तरी काय. सध्या पुण्यातील हिट अँड रन (Hit And Run) प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्शे कार चालवत दोघांना उडवले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना पुण्यातच आणखी एक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील शिरुर तालुक्यात एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीन (१५) मुलीने मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रणगावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी मालवाहतूक टेम्पो घेऊन जात होती. आणखी गंभीर बाब म्हणजे तिच्यासोबत तिचे वडीलही सोबतीला होते. मालवाहतूक टेम्पो घेऊन जात असताना सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप भरधाव वेगात चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असणारा महिंद्र बांडे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मालवाहू पिकअपने दुचाकीसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेले. इतकेच नव्हे तर अपघात झाल्यानंतर पीडितांची मदत न करता त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.


दरम्यान, याप्रकरणी मयत मेमाणे यांचा भाऊ सतीश मेमाणे यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून आरोपी अल्पवयीन मुलीसह तिचे वडील संतोष लेंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिक्रापुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे