Nitesh Rane : कोल्हापुरच्या गादीबद्दलचा नियम सातार्‍याला का नाही?

शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन मविआने अपमानच केला!


संजय राऊतांनी पंतप्रधानांवरुन केलेल्या टीकेवर आमदार नितेश राणे यांचा सणसणीत पलटवार


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज कोल्हापूरमध्ये महायुतीसाठी (Mahayuti) प्रचारसभा आहे. त्यावर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) 'पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपती घराण्याचा अपमान करु नये. छत्रपती घराण्याच्या विरोधात प्रचार म्हणजे गादीचा अपमान', असं वक्तव्य केलं. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 'शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन महाविकास आघाडीने त्यांचा अपमानच केला आहे', अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.


नितेश राणे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, हाच नियम, हीच भूमिका तुम्ही सातार्‍यात असताना का घेतली नाही? त्या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत. ती गादी देखील आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात तुतारीचा उमेदवार का उभा आहे? जो नियम तुम्हाला कोल्हापुरात लावायचा आहे, तोच नियम तुम्ही सातार्‍यातही लावा, असं नितेश राणे म्हणाले.


देशाचे पंतप्रधान मोदी हे उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असताना देशासाठी त्यांनी काय केलं आणि कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे पाहायचं असेल तर संजय राजाराम राऊतला गर्दीमध्ये मी खुर्ची देऊन बसवतो. मग त्याने आमच्या पंतप्रधान मोदींची जादू बघावी. संजय राऊतने याआधी वंशजांचे पुरावे मागितले होते, त्यामुळे त्याच्या तोंडून आमच्या छत्रपती घराण्याच्या बाजूने काहीही ऐकणं हाच मुळात मोठा अपमान आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. संजय राऊतने आधी माफी मागावी आणि मग छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलावं, असंही नितेश राणे म्हणाले.



गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार


गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा परदेशात निर्यात करण्यात येणार आहे, मात्र महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यावर नितेश राणे म्हणाले, गुजरातचा कांदा किती गोड आणि चविष्ट आहे हे तू तुझ्या मालकाला विचार. कारण काही आठवड्यांपूर्वी तुझा मालक आणि त्याचं कुटुंब जामनगरला जाऊन कांदाच खाऊन आले आहेत. तेव्हा अंबानींच्या लग्नात गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही. म्हणून गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार आणि मग तुझं थोबाड उघड, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ