थंडीच्या दिवसात या गोष्टी मिसळून खा, अनेक आजारांवर आहे हा उपचार

मुंबई: थंडीच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि आपण आजारी पडतो. अशातच तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने अनेक आजारांवर उपचार करता येऊ शकतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, ई, के आणि ओमेगा ३ सारखी पोषकतत्वे असतात जे शरीराला आतून मजबूत करतात. तर काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल गुण इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात. हे दोन्ही मिसळून खाल्ल्याने अनेक फायदे होतात.



रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते


तूप आणि काळी मिरीचे सेवन आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, ई आणि के ही जीवनसत्वे आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत होते. काळी मिरीमधील अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. या पद्धतीने दोन्हींचे मिश्रण आजारांशी लढण्यास मदत करतात.



सर्दी-खोकल्यापासून सुटका


थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणे ही सामान्य बाब आहे. अशातच तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने फायदा होतो. तुपातील उष्णतेमुळे शरीराला ऊब मिळते आणि श्वास नलिका साफ होण्यास मदत होते. तसेच काळी मिरीलमधील कॅप्सेसिन नावाचे तत्व इन्फेक्शनशी लढणाऱ्या प्रोटीनचे उत्पादन करते. हे दोन्ही मिसळून सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळते.



थंडीच्या दिवसांत हाडांच्या दुखण्यापासून सुटका


थंडीच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मात्र तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने यामुळे आराम मिळू शकते. तुपामधील उबदारपणामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सांध्यांना वंगण मिळते. तसेच काळ्या मिरीमध्ये इन्फ्लामेंटरी गुण असतात जे सूज कमी करतात.



हृदय आणि लिव्हरसाठी फायदेशीर


तज्ञांच्या मते तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने हृदय आणि लिव्हरचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तुपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदय रोगांचा धोका कमी होतो. यामुळे रक्त संचलन चांगल्या पद्धतीने होते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त

मुंबई : गोरेगावच्या नेस्को मैदानावर आज (गुरुवार २ ऑक्टोबर २०२५) शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि