थंडीच्या दिवसात या गोष्टी मिसळून खा, अनेक आजारांवर आहे हा उपचार

मुंबई: थंडीच्या दिवसात आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि आपण आजारी पडतो. अशातच तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने अनेक आजारांवर उपचार करता येऊ शकतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, ई, के आणि ओमेगा ३ सारखी पोषकतत्वे असतात जे शरीराला आतून मजबूत करतात. तर काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल गुण इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात. हे दोन्ही मिसळून खाल्ल्याने अनेक फायदे होतात.



रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते


तूप आणि काळी मिरीचे सेवन आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करतात. तुपामध्ये व्हिटामिन ए, ई आणि के ही जीवनसत्वे आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत होते. काळी मिरीमधील अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. या पद्धतीने दोन्हींचे मिश्रण आजारांशी लढण्यास मदत करतात.



सर्दी-खोकल्यापासून सुटका


थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणे ही सामान्य बाब आहे. अशातच तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने फायदा होतो. तुपातील उष्णतेमुळे शरीराला ऊब मिळते आणि श्वास नलिका साफ होण्यास मदत होते. तसेच काळी मिरीलमधील कॅप्सेसिन नावाचे तत्व इन्फेक्शनशी लढणाऱ्या प्रोटीनचे उत्पादन करते. हे दोन्ही मिसळून सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका मिळते.



थंडीच्या दिवसांत हाडांच्या दुखण्यापासून सुटका


थंडीच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मात्र तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने यामुळे आराम मिळू शकते. तुपामधील उबदारपणामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सांध्यांना वंगण मिळते. तसेच काळ्या मिरीमध्ये इन्फ्लामेंटरी गुण असतात जे सूज कमी करतात.



हृदय आणि लिव्हरसाठी फायदेशीर


तज्ञांच्या मते तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने हृदय आणि लिव्हरचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. तुपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदय रोगांचा धोका कमी होतो. यामुळे रक्त संचलन चांगल्या पद्धतीने होते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी