Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

Share

पुणे : अहमदनगर -कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात झालेल्या भीषण अपघातात(accident) दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मार्गावर ओतूर परिसरात वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने चालत जाणाऱ्या युवतीसह एका टूव्हीलर गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात पायी चालणारी मुलगी आणि दुचाकीवरील महिला या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकस्वार यात गंभीर जखमी झाला आहे.

ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी या अपघातात मृत महिलांची नावे आहेत तर या अपघातात गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. ऋतुजा ही या रस्त्याने आपल्या घरी पायी चालत जात होती. तर सविता आणि गीताराम हे टू व्हीलरवर होते. यावेळी भरधाव पिकअप व्हॅनने दोघांनाही जोरदार धडक दिली. काही समजण्याच्या आतच हा भीषण अपघात घडला.

त्यानंतर ही पिकअप व्हॅन दुसऱ्या बाजूला जावून उलटली. या अपघातानंतर पिकअपच्या ड्रायव्हरने तेथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार ड्रायव्हरचाही शोध घेतला जात आहे.

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

41 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

45 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago