Accident : अहमदनगर-कल्याण महामार्गावरील भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी

  67

पुणे : अहमदनगर -कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरात झालेल्या भीषण अपघातात(accident) दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती यात गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे ओतूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मार्गावर ओतूर परिसरात वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीने चालत जाणाऱ्या युवतीसह एका टूव्हीलर गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात पायी चालणारी मुलगी आणि दुचाकीवरील महिला या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकस्वार यात गंभीर जखमी झाला आहे.


ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी या अपघातात मृत महिलांची नावे आहेत तर या अपघातात गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्षे) हे गंभीर जखमी झाले. ऋतुजा ही या रस्त्याने आपल्या घरी पायी चालत जात होती. तर सविता आणि गीताराम हे टू व्हीलरवर होते. यावेळी भरधाव पिकअप व्हॅनने दोघांनाही जोरदार धडक दिली. काही समजण्याच्या आतच हा भीषण अपघात घडला.


त्यानंतर ही पिकअप व्हॅन दुसऱ्या बाजूला जावून उलटली. या अपघातानंतर पिकअपच्या ड्रायव्हरने तेथून पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार ड्रायव्हरचाही शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर

99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यावर्षी साताऱ्याला!

तब्बल ३२ वर्षानंतर भरवले जाणार चौथे संमेलन पुणे:  यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (99th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.