Throwing Ink : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक खरी की हाही एक बनाव?

  181

नेटकरी म्हणतात 'जे पेराल तेच उगवेल'


ठाणे : शरद पवारांना (Sharad Pawar) धमकी आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संधी साधत स्वतःच मलादेखील धमकी येत असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. ही धमकी देणारा मयूर शिंदे हा त्यांचाच निकटवर्तीय असल्याचे तपासातून समजले. यानंतर आता ठाकरे गटाच्याच सोशल मीडिया राज्यसमन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काही महिलांकडून शाईफेक करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट (Tweet) करत माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच बनाव रचतात की काय असा सवाल उपस्थित होत आहे.


कळव्यातील मनिषा नगरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी रात्री उशिरा अयोध्या पौळ यांना काही महिलांनी घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. याबद्द्ल अयोध्या पौळ यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.



अयोध्या पौळ सतत ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. काल रात्री अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आहे, असे सांगून मला बोलावण्यात आले आणि आल्यानंतर शाईफेक करण्यात आली. १००-१५० महिलांचा आणि ४-५ मुलांचा हा ट्रॅप असल्याचं अयोध्या पौळ म्हणाल्या. विशेष म्हणजे पोलिस देखील हा प्रकार पाहत होते, असा आरोप पौळ यांनी केला.



या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस महिलांचा शोध घेत आहेत. दरम्यान काही नेटक-यांनी ठाकरे गटाला समोर ठेवून 'जे पेराल तेच उगवेल', अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटक-याने तर चक्क प्रियांका चोप्राचा रंगपंचमीचा फोटो टाकून आता यालाही शाईफेक म्हणणार का, अशी खिल्ली उडवली आहे.




 

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या