Throwing Ink : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक खरी की हाही एक बनाव?

  177

नेटकरी म्हणतात 'जे पेराल तेच उगवेल'


ठाणे : शरद पवारांना (Sharad Pawar) धमकी आल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संधी साधत स्वतःच मलादेखील धमकी येत असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. ही धमकी देणारा मयूर शिंदे हा त्यांचाच निकटवर्तीय असल्याचे तपासातून समजले. यानंतर आता ठाकरे गटाच्याच सोशल मीडिया राज्यसमन्वयक अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर काही महिलांकडून शाईफेक करून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्विट (Tweet) करत माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच बनाव रचतात की काय असा सवाल उपस्थित होत आहे.


कळव्यातील मनिषा नगरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी रात्री उशिरा अयोध्या पौळ यांना काही महिलांनी घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. याबद्द्ल अयोध्या पौळ यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.



अयोध्या पौळ सतत ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. काल रात्री अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आहे, असे सांगून मला बोलावण्यात आले आणि आल्यानंतर शाईफेक करण्यात आली. १००-१५० महिलांचा आणि ४-५ मुलांचा हा ट्रॅप असल्याचं अयोध्या पौळ म्हणाल्या. विशेष म्हणजे पोलिस देखील हा प्रकार पाहत होते, असा आरोप पौळ यांनी केला.



या प्रकरणाची नोंद कळवा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस महिलांचा शोध घेत आहेत. दरम्यान काही नेटक-यांनी ठाकरे गटाला समोर ठेवून 'जे पेराल तेच उगवेल', अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटक-याने तर चक्क प्रियांका चोप्राचा रंगपंचमीचा फोटो टाकून आता यालाही शाईफेक म्हणणार का, अशी खिल्ली उडवली आहे.




 

 
Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली