पुरुषाची बायको जाते तेव्हा तुम्ही काही लावता का?

खासदार सुप्रिया सुळे यांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सवाल


मुंबई : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख कराच असे सरकारने सांगणे म्हणजे एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता हा महिलांवर अन्याय नाही का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.


राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.



हे पण वाचा : ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाला महिला संघटनांचा आक्षेप


यावर, मंगलप्रभात लोढा वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला आश्चर्य वाटले, त्यांच्याशी मी फोनवरुन संपर्क करणार आहे. यात खरंच वेगळेपण करण्याची ऑर्डर काढून करण्याची गरज आहे का? श्रीमती हा शब्द वापरला जातो. तुम्ही त्यांना प्रेमाने काहीही म्हणू शकता परंतु सरकारने ऑर्डर काढून नावापुढे काहीतरी लावणे म्हणजे त्यांना वेगळे करणे आहे. विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. पण असे परस्पर निर्णय घेऊन जनतेला त्याचा काय फायदा होणार आहे, असेही सुळे म्हणाल्या.

Comments
Add Comment

लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Beed: दहावीच्या मुलीचं अपहरण करत...; पीकअप चालकाच्या कृत्याने परिसरात तीव्र संताप

बीड: गेल्या काही काळात बीड जिल्हा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली

महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे.

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील