पुरुषाची बायको जाते तेव्हा तुम्ही काही लावता का?

Share

खासदार सुप्रिया सुळे यांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सवाल

मुंबई : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख कराच असे सरकारने सांगणे म्हणजे एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता हा महिलांवर अन्याय नाही का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.

हे पण वाचा : ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाला महिला संघटनांचा आक्षेप

यावर, मंगलप्रभात लोढा वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला आश्चर्य वाटले, त्यांच्याशी मी फोनवरुन संपर्क करणार आहे. यात खरंच वेगळेपण करण्याची ऑर्डर काढून करण्याची गरज आहे का? श्रीमती हा शब्द वापरला जातो. तुम्ही त्यांना प्रेमाने काहीही म्हणू शकता परंतु सरकारने ऑर्डर काढून नावापुढे काहीतरी लावणे म्हणजे त्यांना वेगळे करणे आहे. विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. पण असे परस्पर निर्णय घेऊन जनतेला त्याचा काय फायदा होणार आहे, असेही सुळे म्हणाल्या.

Recent Posts

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

29 mins ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

30 mins ago

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…

1 hour ago

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

5 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

7 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

7 hours ago