लंडन ते हैद्राबाद विमानात तांत्रिक बिघाड; १६९ प्रवाशांचा जीव टांगणीला

नागपूर : ब्रिटिश एअरवेज बोईंग ७८७ हा विमान लंडनहुन हैद्राबादला येत होते. या विमानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे आपत्कालीन लँडिंग करण्यात आली.  त्यात १६९ प्रवासी प्रवास करत होते. विमानात तांत्रिक विघड झाल्याने ब्रिटिश एअरवेज कंपनीचे विमानाची आपत्कालीन लँडिंग नागपूर मध्ये करण्यात आलं, यामुळे १६९ प्रवाशांचे जीव भांड्यात पडला. आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकाने घेतलेल्या या निर्णयामुळेच १६९ प्रवाशांचे प्राण हे वाचू शकले आहेत. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


विमानात तांत्रिक बिघाडही होता शिवाय दरम्यान हैद्राबाद यामध्ये खराब हवामानामुळे विमानाला लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून नागपूर विमानतळावर विमान उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला . पहाटे साडे पाचच्या सुमारास विमान नागपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आपत्कालीन लँडिंगनंतर विमानाची तपासणी करण्यात आली असून प्रवाशांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.


या आधी काल रात्री रांची मध्ये नुकताच एअर ऍम्ब्युलन्सचा अपघात झाला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाले, विमानांच्या वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विमान प्रवासाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.


मुंबईत देखील एका हेलीकॉप्टरचा अपघात झाला आहे. वैमानिकाने तत्परता दाखवून समुद्रात सुरक्षित लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.



Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा