Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील रसायनशास्त्र विषयाच्या पेपरफूट प्रकरणी पोलिसांनी (२३ फेब्रुवारी) सोमवारी आणखी २ आरोपींना अटक केली. जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (रा. हसनबाग) आणि मुस्तफा खान (रा. भानखेडा) अशा या आरोपींची नावे असून हे दोघेही ट्यूशन क्लास संचालक आहेत.


यापूर्वी पोलिसांनी निशिकांत सुखदेव मून आणि फरहान अख्तर फहीम अख्तर यांना अटक केली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने निशिकांत आणि फरहान यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाली असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा सहभाग असल्याचेही समोर आले आहे.पोलिस सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले मुस्तफा खान आणि जुनैद मोहम्मद हे मोमिनपुरा परिसरातील एक्सलंट अकादमीशी संबंधित आहेत. पोलिस तपास करत आहेत की पेपर कुठून लीक झाला, त्यात बोर्डाचे अधिकारी समाविष्ट होते का, आणि प्रश्नपत्रिका राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पोहोचल्या का.तपासात आरोपींचे कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि व्हॉट्सऍप चॅट्स तपासले जात आहेत.


सुरुवातीला खाजगी कोचिंग क्लास शिक्षक निशिकांत मून आणि विद्यार्थी फरहान यांना अटक करण्यात आली होती. आणखी एका विद्यार्थ्यावर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका “टेक वन” व्हॉट्सऍप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याचा आरोप आहे. या विद्यार्थ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन