महाराष्ट्र भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक फेरबदल केले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी नवी प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून, १२ उपाध्यक्षांसह ४३ जणांची कोअर टीम तयार केली आहे. विशेष म्हणजे मुंबई पालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांच्याकडे महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले आहे.


चव्हाण यांनी १२ जणांच्या खांद्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. या उपाध्यक्षांकडे विभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार, अतुल काळसेकर कोकण, भारती पवार उत्तर महाराष्ट्र, संजय कौडगे मराठवाडा, संजय भेंडे विदर्भ, रामदास तडस विदर्भ, केशव उपाध्ये मुंबई, प्रवीण पोटे विदर्भ, गोपीचंद पडळकर पश्चिम महाराष्ट्र, चैतन्य देशमुख मराठवाडा, प्रिया शिंदे पश्चिम महाराष्ट्र, सुजय विखे पाटील उत्तर महाराष्ट्र आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.


त्याशिवाय आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे यांच्याकडे सरचिटणीस पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे कोकण, मुंबई, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागाची जबाबदारी असेल. या व्यतिरिक्त १२ सरचिटणीस नेमण्यात आले आहे. आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे मुंबईचे कोषाध्यक्ष पद देण्यात आले आहे. विविध सेलचे अध्यक्षही नेमण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India