संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण


संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता आणि बेल्टने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिसांनी अटक केली आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी ममता रोहित वाळके (वय २९, रा. श्रीरामनगर) यांचे पती रोहित वाळके हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास इंदिरानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील मैदानावर 'टुर्ला' मॅच खेळण्यासाठी गेले होते. यावेळी हल्लेखोरांनी जुन्या वादाचा राग मनात धरून रोहित यांच्यावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचत असताना, रोहित यांचा मित्र उत्तम काकड याला आरोपींनी ओढल्यामुळे रोहित यांनी त्यांना तसे करण्यापासून रोखले होते. याच कारणावरून या पाच जणांनी त्यांच्याशी वाद उकरून काढला.त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने रोहित यांच्यावर हल्ला चढवला. अथर्व रासने, ओम काथे, साहिल देवरे, सुमित शेवंते व शनैश रोकडे (सर्व रा. संगमनेर) यांनी रोहित यांच्या मानेवर कोयत्याने वार केला, खांद्यावर कोयता मारून गंभीर दुखापत केली, तसेच बेल्टने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.


या घटनेनंतर जखमी रोहित यांना तातडीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ममता रोहित वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये अथर्व रासने याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि पोलीस उपनिरीक्षक पगारे यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत. शहरात अशा प्रकारे शस्त्राने हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण