कोरोना, लॉकडाऊन त्यांचा आवडता विषय

मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले


नागपूर : सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले नसते. चायना, कोरीया जपानमध्ये कोरोना सुरु झाला, तो निकष आपल्याकडे लावून विदर्भात अधिवेशन घेतले नसते. अजित पवारांना माहीत आहे की, कोविड आणि लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय आहे, असे खोचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. आज विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गाच्या उद्घाटनावरुन विरोधकांनी वाद घातला. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे हा महामार्ग होऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांना जमीनी देऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले. मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण माहीत आहे. काम करताना याचा आम्हाला फायदा होईल. मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे किती काळ होते हे सर्वांना माहीत आहे. विदर्भाला मुख्यमंत्रीपद किती काळ होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विदर्भाचा अनुशेष दुर करण्यासाठी मविआला न्याय देता आला असता. विदर्भाच्या बाबतीत सर्वांनाच संवेदना असावी. विदर्भाला काहीतरी द्यायला हवे. कालबद्ध पाऊले टाकण्याची इच्छाशक्ती हवी. सरकार म्हणून जबाबदारी पाळणार व काही तरी ठोस निर्णय घ्यायचे आहेत. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रासाठी विदर्भ महत्वाचा आहे. विदर्भाचा विकास आम्ही केंद्रस्थानी मानतो. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू झाला. तो सुरू करुन उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचा महामार्ग सुरू केला. विदर्भातील समृद्धी महामार्गामुळे दहा जिल्हे चौदा जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडले जातील. नागपूर, गडचिरोली, गोंदीया, भंडारा, चंद्रपूर अशा जिल्ह्यांना जोडत आहोत. मराठवाड्यात जालना-नांदेडलाही जोडत आहोत. इंटरस्टेटही हा मार्ग कनेक्ट करीत आहोत.


अजित पवार यांना २००४ मध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, संधी असतानाही शरद पवार यांनी अजित दादांना मुख्यमंत्री केले नाही, असा टोला गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हाणला. फडणवीस म्हणाले, आम्ही विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना मार्गी लावल्यात. अनेक उद्योग आणलेत. विदर्भात मदर डेअरी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलाला मिळाला. विदर्भात पतंजलीचा प्रकल्प जानेवारी महिन्यात सुरू होत आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०