hunger strike : निलेश लंकेंचे उपोषण अजित पवार यांच्या मध्यस्थीने मागे

अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण (hunger strike) सुरू केले होते. हे उपोषण अखेर आज चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आलं आहे. अजित पवार हे उपोषणस्थळी आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. तसंच त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोन करून संवाद साधला.


निलेश लंके यांच्याशी देखील नितीन गडकरी यांनी फोन वरून चर्चा केली. गडकरींकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले.


अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती. यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने मागील चार दिवसांपासून ते उपोषण करत होते. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ठोस शब्द देत नाहीत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना