‘खावटी किट’ नावाखाली आदिवासी समाजाला निकृष्ट दर्जाचे धान्य

नालासोपारा (वार्ताहर) : आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विभाग महामंडळ यांच्या मार्फत आदिवासीयांना खावटीच्या किटचे वाटप चालू आहे. या वाटपात बारा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली आहे. तर अर्नाळा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात ३७७ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. परंतु, यातील वस्तू अतिशय निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने आदिवासिंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.


आदिवासी समाजाला चांगल्या प्रकारचे अन्न मिळावे व त्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विभाग महामंडळ यांच्यामार्फत आदिवासिंसाठी अन्न - धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या ‘किट’चे वाटप करण्यात आले. बुधवारी अर्नाळा ग्रामपंचायतीने लेखी ग्रामपंचायत कार्यालयात जीवनावश्यक वस्तूंचे ३७७ किट वाटले. परंतु बंद पाकिटे उघडली असता त्यातील डाळ ही बुरशीने माखलेली दिसली. इतर दुसऱ्या वस्तू देखील जुन्या व खराब दर्जाच्या देण्यात आल्या आहेत असे निदर्शनास आले. कोरोना काळात आदिवासींचा रोजगार गेला, उपासमारी सुरू झाली. त्यामुळे आदिवासींना केवळ रेशनचे तांदूळ न देता खावटीचा लाभ देखील मिळावा यासाठी योजना काढण्यात आली. या योजनेत २००० पर्यंतचे सामान व २००० बॅंक खात्यात, असे धोरण करण्यात आले होते.


खावटी अनुदान योजनेत एका कूटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मिठ, चहापत्ती अशा दोन हजार रु. पर्यंतच्या वस्तूंचे किट देण्यात येईल अशी योजना आहे. मात्र, आधीच या योजनेस उशीर झाला. तर उशिराने आलेल्या या किटमध्ये खराब व निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचे वाटप करून आदिवासींची फसवणूक केली गेली आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळण्याचे काम शासनाने चालविले आहे. तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.


लाभ देण्याच्या नावाखाली प्रशासनाने अतिशय हलक्या दर्जाचे सामान दिल्याने आदिवासींना या वस्तूंचा काहीच उपयोग नाही. याला जबाबदार नेमका कोण आहे? तर यावर कारवाई होणार कधी? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत. तसेच याबाबत तातडीने चौकशी करून या संपूर्ण प्रकाराची कारवाई करावी; तसेच वाटण्यात आलेल्या खराब व निकृष्ट वस्तूंची पाहणी करुन पुन्हा चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन

संजय गांधी उद्यानातून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर घडणार वाघाचे दर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी): गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून

गोवंडी शताब्दी रुग्णालयासाठी तेरणा आणि सुरभी एज्युकेशन संस्थेत स्पर्धा

​मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेची चार रुग्णालये सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर चालवण्यास देण्याचा

बारावी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ

मुंबई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेतल्या

स्थानिक विरोधामुळे मेट्रो कारशेडचा 'उत्तन-डोंगरी' प्लॅन रद्द!

७३३ कोटींच्या प्रकल्पाला एमएमआरडीएकडून मूठमाती; झाडे वाचवण्यासाठी नागरिकांची मोठी लढाई मुंबई: उत्तन-डोंगरी

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार नेते शशांक राव यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन महापालिका व सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी