Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीकंगना राणावत खार पोलीस ठाण्यात; दीड तास नोंदवला जबाब

कंगना राणावत खार पोलीस ठाण्यात; दीड तास नोंदवला जबाब

मुंबई :दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका केल्यासंदर्भात संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावतने खार पोलीस ठाण्यात गुरुवारी हजेरी लावली. दीड तास तिचा जबाब नोंदवण्यात आला.

काही दिवसांपूर्वी कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करताना आंदोलनाचा संबंध एका फुटीरतावादी संघटनेशी असल्याचे सांगितले. त्यानंतर शीख संघटनांनी मागील महिन्यात खार पोलीस ठाण्यात कंगना विरोधात तक्रार दाखल केली होती.

दिल्लीच्या सीमेवर झालेले शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन आहे, असं कंगनाने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कंगनाच्या या टिप्पणीनंतर शीख संघटनांकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

शीख संघटनेने केलेल्या तक्रारीवर खार पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरविरोधात कंगनाने या हायकोर्टात धाव घेतली होती. पोलिसांनी कंगनाविरोधात २५ जानेवारी २०२२ पर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -