- यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आमदार अमित साटम यांची मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिकेने (BMC News) केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव (natural lakes) आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (BMC News)
- बोगस डाॅक्टर्सच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहाचे आरोग्य बिघडले; महापालिका सभागृहाची एकमुखी मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या ...
मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार यांनी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब हा शहरातील पाणी टंचाईस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पावसावर १०० टक्के अवलंबून राहणे दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे साटम यांनी म्हटले आहे. (BMC News)
- दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपयांचा केला जाणार खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडत असून या ...
शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करावा, तसेच त्या ठिकाणी आरओ प्रकल्प उभारून पाणी वापरयोग्य बनवावे, अशी मागणीही साटम यांनी केली आहे. यानंतर परिसरातील भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वितरण यंत्रणा उभारता येईल. भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन क्षारनिर्मूलन (डिसॅलिनेशन) प्रकल्पाची क्षमता १००० एमएलडीपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यासाठीचे काम कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. (BMC News)




