Wednesday, June 24, 2026

BMC News : पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईत ५४७ पंप

BMC News : पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईत ५४७ पंप

- दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपयांचा केला जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडत असून या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुढील दोन वर्षांकरता पंप बसवण्यात येणार आहे. . पुढील दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मागील वर्षी ४८१ पंप बसवण्यात आले होते, तर यंदा हे आता ५४७ पंप बसवले जाणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६६ पंपांची वाढ झाली आहे. (BMC News)

मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे, पावसाचे पाणी सखल भागात जमा होते व त्याचा निचरा होत नाही. अशा साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे जवळपासच्या वस्तीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते व त्याचा वहानांच्या रहदारीवर तसेच जनजीवनावर परिणाम होतो, म्हणुन मुंबई महानगरपालिका अशा सखल भागातील पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मागील १६ वर्षांपासून पाण्याचा उपसा करणारे पपं बसवण्याची व्यवस्था करीत आहे. मुसळधार पावसात साचलेले पाणी या पंपांद्वारे जवळपासच्या नाल्यात, मलनिःसारण वाहिन्यांमध्ये तसेच पर्जन्य जल वाहिनीत सोडले जाते. (BMC News)

मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमध्ये आणि राजे एडवर्ड व लोकमान्य टिळक ही दोन मोठी रुग्णालये आदी परिसरांमध्ये हे पंप बसवले जाणार आहेत..

सन २०२५मध्ये विविध ठिकाणी ४८१ पंप भाडेतत्वावर घेण्यात आले होते. त्यानंतर आता सन २०२६ व सन २०२७ या कालावधीसाठी ५४७ पंप बसवण्यात येणार आहे. या दोन वर्षांसाठी सुमारे १४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC News)

महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार. महापालिका प्रशासनाच्यावतीनउदंचन संचाच्या कार्यावर प्रभावीपणे देखरेख ठेवण्याकरीता तसेच पारदर्शकता प्राप्त करण्याकरीता प्रत्येक उदंचन संचावर आय. ओ.टी उपकरण बसविण्यात येणार आहे. या पंपांचीचालु व बंद माहिती आय.ओ.टी उपकरणाद्वारे थेट मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पी.एम.एस. या प्रणालीवर पाठविण्यात येईल. तसेच प्रत्येक पंपांवर बसविलेल्या ठिकाणी नेमून दिलेल्या कामगार वर्गाच्या भ्रमणध्वनीला भू-कुंपण केले जाईल. अशाप्रकारे भ्रमणध्वनींचे भू-कुंपण केल्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल थेट एका ऍपद्वारे प्राप्त होणार आहे. अशाप्रकारे आय.ओ.टी उपकरण व भू-कुंपण यांचा वापर पंपांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याकरीता प्रथमच मुंबई हानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >