मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे.
त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने, प्रभावी संवादशैलीने आणि हृदयाला भिडणाऱ्या अभिनयाने त्यांनी भारतीय सिनेमाला एक वेगळं स्थान प्राप्त करून दिले. ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि बॉलिवूडचा हि - मॅन अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली.
आज जरी एक सुवर्णयुग संपले असले, तरी धर्मेंद्रजींच्या अभिनयाची आणि संस्कारांची अमिट छाप सदैव आपल्या स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशा शब्दात माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.






