नवी दिल्ली : दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने पेट्रोलचे दर ८ रुपयांनी कमी केले आहेत. तसेच व्हॅटमध्येही मोठी कपात केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज रात्रीपासूनच हे नवे दर लागू होणार आहेत.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठाकरे सरकार देखील असा निर्णय घेणार का? असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने पाच रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले होते.
देशभरात पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.