Monday, May 6, 2024
Homeताज्या घडामोडीकेंद्र सरकारकडून विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी

केंद्र सरकारकडून विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६.८ टक्के अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी देशात धान्याचा कोणत्याही प्रकार तुटवडा भासणार नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच तांदूळ महाग होणार नसल्याचेही सरकारनं सांगितलं आहे.

सध्या केंद्र सरकार विविध राज्यात तांदळाची खरेदी सुरु आहे. या परिस्थितीत खरेदीचे नवे आकडे समोर आले आहेत. हे आकडे देशवासीयांसाठीही आनंददायी आहेत. देशात गतवर्षीपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली आहे. केंद्र सरकारनेही जनतेला अन्नधान्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारकडे असलेला बफर स्टॉक पुरेसा असून, आता कोणताही साठा करू नका असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये तांदळाची खरेदी केली जात आहे. जिल्हा स्तरावरून सर्व डेटा गोळा करून राजधानीला पाठवला जात आहे. आकडेवारीनुसार, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये यावर्षी तांदळाच्या खरेदी वाढवली आहे. उत्तर प्रदेश हे अन्नधान्न्याच्या उत्पादनाचं प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -