साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले
वर्धा : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील पुलगाव येथे तांदळाच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८८ हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. या गोदामामध्ये अनेक दिवसांपासून तांदळाचा काळाबाजार (Black marketing of Rice) सुरु असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार छापा टाकत हा तांदूळ जप्त करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे वर्ध्यातील शासकीय तांदूळ छत्तीसगडला रवाना होत होता. स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ खरेदी करुन तो छत्तीसगडच्या राईस मिलमध्ये पाठवला जायचा, ही बाब तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी तांदळाची वाहतूक करणार्या तीन ट्रकचालकांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील महेश शामलाल अग्रवाल या व्यापार्याचं हे गोदाम होतं. वर्धा पोलिसांच्या कारवाईनंतर शासकीय तांदळाचा काळाबाजार करणार्या साठेबाजांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra