Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडी"शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी?

“शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी?

फोडाफोडीच्या राजकारणावर अजित पवारांचा सवाल

पुणे : शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी,आम्ही केली की गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आले आहेत. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली असून, दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. आज फोडाफोडीच्या राजकारणावरून अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांनी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना अजित पवार म्हणाले की, १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्यासोबत काय घडले, त्याबाबत संजयभैय्या बोलले आहे. वसंतदादा शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या नेतृत्वात सरकारचे कामकाज सुरू होते. मात्र, ते सरकार पाडले गेले. मग जनता पक्षाला घेऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांचे ऐकले नाही. ज्यांनी संधी दिली त्यांचेही ऐकले नाही, असे अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी मुंबईला पोहोचेपर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा आहे, असे जाहीर केले होते. मी म्हटले हे कसं काय झाले, तर मला म्हणाले ही आपली स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे यांनी केले की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी, मी केले की वाटोळे, असे विधान अजित पवार यांनी केले .

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -