Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाBCCIने कसोटी क्रिकेटर्सची वाढवली सॅलरी, आता एका सामन्यासाठी मिळणार इतके लाख रूपये

BCCIने कसोटी क्रिकेटर्सची वाढवली सॅलरी, आता एका सामन्यासाठी मिळणार इतके लाख रूपये

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्लान केला आहे. बोर्डाने कसोटी खेळाडूंसाठी इन्सेटिव्ह स्कीम लागू केली आहे. आता एका हंगामात ७५ टक्के कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला एका सामन्यासाठी तब्बल ४५ लाख रूपये मिळतील. तर एका हंगामात ५० ते ७४ टक्के सामने खेळणाऱ्या खेळाडूला प्रति सामन्यासाठी ३० लाख रूपये मिळतील.

धरमशाला कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. एका कसोटी खेळाडूला जो हंगामात १० कसोटी सामन्यात भाग घेत असेल तर त्याला प्रोत्साहन म्हणून ४.५० कोटी रूपयांची मोठी रक्कम मिळेल. सोबतच वरिष्ठ क्रिकेटर्सना वार्षिक केंद्रीय कराराअंतर्गत रिटेनर फीही मिळेल.

अनुभवी क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना या वर्षी कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही तर त्यांना गेल्या सत्रासाठी प्रोत्साहन राशी दिली जाईल. जय शाह म्हणाले मंडळ २०२२-२३ आणि २०२३-२४ साठी तब्बल ४५ कोटी रूपये खर्च करणार आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकारांशी बातचीत करताना म्हटले की या योजनेमुळे खेळाडूंची इंडियन प्रीमियर लीगच्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा अधिक कमाई होईल. आयपीएल हे महत्त्वाचे आहेच मात्र द्विपक्षीय क्रिकेटही तितकेच महत्त्वाचे आहे. यात एकूण ४५ कोटी रूपये खर्च होतील.

उदाहरणार्थ, भारताचा कर्णधार रोहित शर्माने २०२३-२४ या हंगामात सर्व १० कसोटी सामने खेळले आहेत त्यामुळे टेस्ट क्रिकेटला प्राथमिकता देण्यासाठी १.५ कोटी रूपये मॅच फीमिळेल. सोबतच त्याला ४.५ कोटी रूपयेही मिळतील. अशातच कसोटी क्रिकेटमधून त्याची कमाई ६ कोटी रूपये झाली. सोबतच त्याची वार्षिक कमाई ७ कोटी रूपये यात जोडल्यास एकूण कमाई १३ कोटी रूपये होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -