रत्नागिरी (वार्ताहर) : हे सरकार अलिबाबा चाळीस चोरांचे आहे, तुमच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. न्यायपालिका आपणास न्याय देईल. शांततेने, संयमाने न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवा. मंत्र्यांना संपकरी मंडळी दिसत नाहीत. मंत्र्यांसह पालकमंत्र्यांना बरेच मोठे पोलीस संरक्षण दिले जात आहे, पण एस.टी. कर्मचारी काय तुम्हाला त्रास देत आहेत का? शिवशाहीचे कंत्राट कोणाचे हे पाहिले पाहिजे. हे राज्य सरकार एसटीचे खासगीकरण, मोक्याच्या जागा लुटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची शनिवारी भेट घेतल्यानंतर बाळ माने बोलत होते. ते म्हणाले, एसटीचे कर्मचारी सर्वच राजकीय पक्षांकडे आशेने पाहत आहेत. पण सत्ताधारी पक्ष, नेते, लोकप्रतिनिधींना तुमच्या वेदना समजून घेण्यास वेळ नाही. दोन महिन्यांत ७७ कर्मचारी सोडून गेले. हे सरकार कल्याणकारी नाही. एसटी तोट्यात नाही पण हे सरकार सातत्याने एसटी तोट्यात असल्याचे दाखवत आहे. अवैध वाहतूकदारांवर कारवाई केली जात होती. पण आता त्यांचीच मदत घेऊन, हप्ते घेऊन वाहतूक सुरू आहे. पण दुर्दैवाने अपघात झाला तर भरपाई देणार कोण, याला जबाबदार कोण? असा सवाल माने यांनी उपस्थित केला.
पूर्वी वीज महामंडळाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी अनंत गीते ऊर्जामंत्री होते. केंद्र सरकारने अभ्यास केला आणि विभाजन केले. आज त्याचा फायदा मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल विभाग, रेल्वे वाहतूक, बीएसएनएल याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. विचार करून एसटीबाबत निर्णय घेतल्यास एसटी फायद्यात येईल. मालवाहतूक एसटीला तारेल. माझे एसटीशी