Nashik : देशभरात कांद्याच्या दरात तब्बल ५९ टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारने बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढविण्यास सुरुवात केली आहे. दर नियंत्रणात आणण्यासाठी नाशिकमधून देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये समर्पित रेल्वे रेकद्वारे मोठ्या प्रमाणावर कांदा पाठविला जात आहे. ‘कांदा एक्स्प्रेस’च्या माध्यमातून हा कांदा विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Ahilyanagar : देशभरात श्रावण महिन्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहे.अनेक ठिकाणी श्रवणानिमित्त उत्सव आणि ...
कांद्याचे दर ५९ टक्क्यांनी वाढले
नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agricultural Produce Market Committees) कांद्याची आवक घटल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ४ हजार २५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वाढत्या दराचा परिणाम देशातील प्रमुख महानगरांमधील कांद्याच्या बाजारभावावरही झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, कांद्याच्या दरात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारातील पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नाशिकमधून प्रमुख ग्राहक केंद्रांकडे कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे रेकमधील कांदा बुधवारी सायंकाळपर्यंत संबंधित बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची अपेक्षा ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे.
Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कावड यात्रेत सहभागी झालेल्या १० ...
कांदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा
दरम्यान, राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ अर्थात एनसीसीएफकडून मंगळवारी लासलगाव रेल्वे स्थानकातून (Lasalgaon Railway Station) ८४० टन कांदा पाठविण्यात येणार आहे. नाफेडकडूनही लवकरच कांदा पाठविण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारने ग्राहकांसाठी खरेदी केलेला कांदा बाजारातील व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे. सरकारी कांदा खरेदी योजनेचा शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना अपेक्षित फायदा झाला नसून मोजक्या व्यापाऱ्यांनाच त्याचा लाभ झाल्याचा आरोप त्यांनी केला.
Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. साक्री तालुक्यातील रायपूर येथे फोन करून तरुणीचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न ...
सरकारी खरेदीचे उद्दिष्ट अपूर्ण
केंद्र सरकारने दर स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला मिळून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, खुल्या बाजारात चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाफेडला सुमारे ६० हजार मेट्रिक टन, तर एनसीसीएफला सुमारे ४० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करता आला आहे. सरकारी खरेदीतील कांद्याच्या प्रतवारीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, एनसीसीएफचा कांदा मंगळवारपासून देशांतर्गत बाजारात पाठविण्यात येणार असून, नाफेडकडूनही लवकरच ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कांदा एक्स्प्रेसच्या माध्यमातून वाढीव पुरवठा बाजारात आल्यानंतर दर कितपत नियंत्रणात येतात, याकडे शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.