Nashik : नाशिक शहरातील रस्त्यांवरील वारंवार होणारे खोदकाम आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येमुळे नाशिककर पुरते वैतागले आहेत. त्यामुळे आता या खड्ड्यांच्या समस्येवर महापालिकेने (Nashik Municipal Corporation) कडक भूमिका घेतली आहे. एमएनजीएलच्या गॅस वाहिनीसाठी होणारे खोदकाम, रस्ते पुनर्स्थापना आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत महापालिका प्रशासन आणि एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत खोदकाम आणि रस्ते दुरुस्तीबाबत काही महत्त्वाचे नियम निश्चित करण्यात आले. (Nashik News)
Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून ...
रस्त्याची पुनर्स्थापना नियमांनुसार करा
गॅस वाहिनीचे काम थांबविण्याची महापालिकेची भूमिका नसली, तरी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि रस्त्यांची अवस्था अधिक खराब होणार नाही, अशा पद्धतीने झाले पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला. त्यासाठी एमएनजीएलने खोदकाम केल्यानंतर रस्त्याची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने आणि निर्धारित नियमांनुसार करावी, असे स्पष्ट करण्यात आले. काम सुरू असताना बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे काम सुरू असतानाही वाहतूक आणि नागरिकांची दैनंदिन ये-जा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Nashik News)
Yeola Paithani postage stamp : महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या नासिक जिल्ह्यातील येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा ...
एमएनजीएलकडून ‘सॉ कटर’चा वापर
रस्ते खोदताना एमएनजीएलकडून ‘सॉ कटर’चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्याचा कट व्यवस्थित आणि अचूक होऊन पुनर्स्थापनेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय एमएनजीएलकडून महापालिकेला सविस्तर जीआयएस नकाशा देण्यात येणार आहे. यामध्ये पूर्ण झालेली, सुरू असलेली आणि प्रस्तावित कामांची माहिती असेल. तसेच ग्राहकांच्या तक्रारींसाठी कंपनीचा हेल्पलाइन क्रमांक ४८ तासांत कार्यरत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. घराघरातील गॅस जोडणीच्या नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिकेच्या कर विभागातील (Municipal Corporation's Tax Department) कर्मचाऱ्यांची मदत देण्याची तयारीही प्रशासनाने दर्शविली आहे. त्यामुळे गॅस वाहिनीचे काम सुरू ठेवतानाच रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.