CJP Protest : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

- राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या मुदतीत वाढ


मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या धोरणात राज्य शासनाने सुधारणा केली आहे. या अंतर्गत विविध राजकीय व सामाजिक आंदोलनांमधील ज्या गुन्ह्यांमध्ये ३१ मार्च, २०२७ पर्यंत दोषारोपपत्रे (चार्जशीट्स) दाखल होतील, असे खटले आता कायदेशीर तरतुदींनुसार मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, यामुळे हजारो राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना, विशेषतः दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या मोर्चांमधील तरुण आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



सार्वजनिक हिताच्या किंवा विविध सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून घेराव घालणे, मोर्चे काढणे व निदर्शने करणे यांसारखे आंदोलनाचे मार्ग अवलंबले जातात. अशा वेळी कार्यकर्त्यांवर दाखल होणारे खटले मागे घेण्यासाठी शासनाने यापूर्वी २१ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्या नियमानुसार ३१ जुलै २०२६ पर्यंत दोषारोपपत्र दाखल झालेले खटलेच मागे घेण्यास मंजुरी देण्यात आली होती. तथापि, ही मुदत संपल्यामुळे आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची मोठी संख्या पाहता, या कालावधीत वाढ करण्याची बाब गेल्या काही काळापासून शासनाच्या विचाराधीन होती. अखेर गृह विभागाने यामध्ये सुधारणा करत ही मुदत दीड वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च, २०२७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


या सुधारित निर्णयामध्ये राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची बाब समाविष्ट केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि तीव्र आंदोलने झाली होती. या आंदोलनांमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. त्या वेळी झालेल्या कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी अनेक आंदोलक तरुण आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या न्यायालयीन खटल्यांमुळे अशा आंदोलक विद्यार्थी आणि तरुणांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिक भविष्य धोक्यात येऊ नये, हा संवेदनशील दृष्टिकोन समोर ठेवून त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले हे सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Comments
Add Comment

Kurla landslide incident : कुर्ला आणि राजावाडी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमी व मृतांची माहिती समोर; ७ जणांचा मृत्यू, ७ जखमी

मुंबई : कुर्ला येथील भाभा रुग्णालय आणि राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी आणि मृतांची प्राथमिक

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा स्थापना वर्धापन दिन; वरळी डोममध्ये भव्य कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा