Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा २१ वा स्थापना वर्धापन दिन; वरळी डोममध्ये भव्य कार्यक्रम

मुंबई : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (१३ ऑगस्ट) मुंबईतील वरळी डोम, नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने स्थापना वर्धापन दिनासोबत परिसंवाद आणि कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. (Devendra Fadnavis)


या कार्यक्रमाला जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. (Devendra Fadnavis)



सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन :


गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता वरळी डोम, NSCI येथे कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचे नियमन, शाश्वत वापर आणि जलव्यवस्थापनातील विविध महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. (Devendra Fadnavis)



माझगाव डॉकसोबत महत्त्वाचा सामंजस्य करार :


कार्यक्रमादरम्यान माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या कराराअंतर्गत ‘जलप्रशुल्काच्या परिणामाचे मूल्यांकन, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उपाययोजना’ या विषयाशी संबंधित बाबींवर सहकार्य करण्यात येणार आहे. (Devendra Fadnavis)



२१ वर्षांच्या वाटचालीचा आढावा :


महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला २१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यासोबतच पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हक्कदारीचे निकष, डिजिटल अहवाल आणि विविध माहितीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील जलसंपत्तीच्या नियमनाच्या क्षेत्रात प्राधिकरणाने केलेल्या कामाचा आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे. (Devendra Fadnavis)



दिवसभर परिसंवाद आणि कार्यशाळा :


जलसंपत्तीचे नियमन तसेच जलसंपत्तीचा शाश्वत आणि प्रभावी वापर यासंदर्भातील विविध विषयांवर दिवसभर परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्वेताली ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र होणार आहे. यामध्ये राज्यातील जलसंपदा विभागातील विविध महामंडळांचे कार्यकारी संचालक, वरिष्ठ अभियंते तसेच पाणी वापर संस्थांशी संबंधित शेतकरी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. (Devendra Fadnavis)



तज्ज्ञांकडून तांत्रिक विषयांवर चर्चा :


कार्यशाळेदरम्यान जलसंपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध तांत्रिक आणि धोरणात्मक विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र मोहिते आणि डॉ. प्रभात जैन यांच्या अध्यक्षतेखाली विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विषयातील तज्ज्ञ अभियंते, विविध महामंडळांचे कार्यकारी संचालक तसेच प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जलसंपत्तीचा नियमनबद्ध, शाश्वत आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातील उपाययोजनांवर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाणार आहे. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Ghatkopar Landslide Accident : जखमी नागरिकांना ५० हजारांची मदत तर मृतांच्या वारसांना ४ लाख; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा

मुंबई : कुर्ला पश्चिमेतील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे बुधवारी (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलनाची

Practical Marathi knowledge for Drivers : प्रवासी वाहनचालकांना आता व्यवहारिक मराठी अनिवार्य! नियम मोडल्यास ३ महिन्यांपर्यंत परवाना निलंबित, पुढे कायमचा रद्द होणार

मुंबई : महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Rename Of Clean Mumbai Awareness Campaign : मुंबईत स्वच्छतेच्या कामांत आता 'प्रबोधन' नाही तर 'सेवा'

- ठाकरेंच्या काळातील स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे नाव बदलले - भाजपच्या काळात आता बृहन्मुंबई स्वच्छता सेवा

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींच्या मार्गात अडथळा; स्थायी समितीत प्रस्ताव मंजुरीनंतर महापालिका सभागृहात लटकला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक विकासकांनी मंजुर आराखड्याची पुतर्ता न करता बांधकाम केले आहे, अशा

BMC News : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या चार मुख्य जलवाहिन्यांचा एसआरए योजनेला अडथळा

- जलवाहिनी स्थलांतरीत करून योजना राबवली जाणार - महापालिका सुधार समितीत प्रस्ताव सादर मुंबई (विशेष

Vile Parle Fire : विले पार्ल्यात भीषण आग; अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

मुंबई : मुंबईतील विले पार्ले (पश्चिम) परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागून हृदयद्रावक दुर्घटना घडली. चर्च