Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे प्रमुख पराग जैन यांनी बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) डॉ. एकेएम शम्सुल इस्लाम यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनीही पंतप्रधान तारिक रहमान यांची स्वतंत्र भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या दोन उच्चस्तरीय भेटींमुळे भारत-बांग्लादेश संबंध आणि विशेषतः माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या संभाव्य बांग्लादेश वापसीबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.



RAW प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय शिष्टमंडळ ढाक्यात :


RAW प्रमुख पराग जैन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांचे चार सदस्यीय शिष्टमंडळ रविवारी दुपारी अधिकृत दौऱ्यावर ढाका येथे पोहोचले. बांग्लादेशच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स (DGFI) या प्रमुख लष्करी गुप्तचर संस्थेच्या निमंत्रणावरून हे शिष्टमंडळ बांग्लादेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे.


या शिष्टमंडळात पराग जैन यांच्यासह अश्विन मुकुंद कोटनीस, राहुल नेगी आणि शैबल रॉय चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती आहे. शिष्टमंडळाने ढाका येथील हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बांग्लादेशमध्ये प्रवेश केला.



हसीनांच्या परतीमुळे भेटीला महत्त्व :


भारत आणि बांग्लादेशच्या गुप्तचर संस्थांमधील अधिकाऱ्यांच्या बैठका यापूर्वीही होत आल्या आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत या भेटींकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांग्लादेश सोडल्यानंतर भारतात वास्तव्य केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी बांग्लादेशात परतण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. नुकतेच त्यांनी नवी दिल्ली येथून माध्यमांशी ऑनलाइन संवाद साधताना डिसेंबरपर्यंत मायदेशी परतण्याबाबत भाष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.



हसीनांच्या परतीची तारीख आणि सुरक्षेवर चर्चा?


काही माध्यमांच्या सूत्रांनुसार, ढाका येथे पोहोचलेल्या भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या संभाव्य बांग्लादेश वापसीची प्रक्रिया, तारीख आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केल्याचा दावा केला आहे. या चर्चेबाबत अधिकृतपणे कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तसेच शेख हसीना यांच्या परतीबाबत भारत किंवा बांग्लादेश सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.


मात्र, काही अहवालांमध्ये भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान कार्यालयात तारिक रहमान यांची भेट घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.



BRICS परिषदेनंतर हसीनांची वापसी?


सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये तारिक रहमान यांच्या BRICS शिखर परिषदेनंतर शेख हसीना (Sheikh Hasina) बांग्लादेशात परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, BRICS शिखर परिषदेच्या संदर्भातील परिस्थितीबाबतही अनिश्चितता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे हसीना नेमक्या कधी आणि कोणत्या परिस्थितीत बांग्लादेशात परतणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.



एका दिवसात दोन महत्त्वाच्या भेटी :


विशेष म्हणजे, RAW प्रमुखांची बांग्लादेशच्या संरक्षण सल्लागारांशी भेट आणि त्याच दिवशी भारतीय उच्चायुक्तांची पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशी भेट झाल्याने या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि राजनैतिक पातळीवरील या बैठकांमध्ये सीमा सुरक्षा, दहशतवाद, गुप्तचर सहकार्य आणि बांग्लादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बैठकीतील चर्चेचे अधिकृत तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.


दरम्यान, शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या संभाव्य परतीबाबतचे वृत्त अद्याप सूत्रांवर आधारित दाव्यांपुरतेच मर्यादित असून, त्यांच्या बांग्लादेश वापसीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

Comments
Add Comment

YouTube च्या नियमात मोठे बदल! आता नवीन क्रिएटर्ससाठी कमाईचा मार्ग होणार आणखी कठीण

नवी दिल्ली : युट्यूब (YouTube) वरून कमाई करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे.

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून