Chhatrapati Sambhajinagar : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लोकांशी जोडण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले आहे. मात्र, याच सोशल मीडियाचा वापर करून फसवणूक आणि फसव्या ओळखींचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून अशीच एक अत्यंत संतापजनक आणि डोळे उघडणारी घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामवरील एका ओळखीने तीन मुलींच्या आईचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले, याची ही थरारक कहाणी आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विधवा महिला आपल्या तीन मुलींसह वास्तव्य करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर चॅटिंगमध्ये झाले आणि दोघे संपर्कात आले. दोन महिने सतत चाललेल्या चॅटिंगमुळे त्यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर त्या तरुणाने महिलेच्या घरी जाऊन संवाद साधला. आपली कौटुंबिक परिस्थिती अतिशय उत्तम असल्याचे भासवत त्याने महिलेचा पूर्ण विश्वास संपादन केला.
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पोलीस दलात भरती होऊन स्वतःचं आणि कुटुंबाचं स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या जिद्दीने ...
एवढेच नव्हे तर, ‘मी तुझ्या तिन्ही मुलींचा योग्य सांभाळ करेन आणि त्यांना चांगली जबाबदारी पार पाडून देईन,’ असे खोटे आश्वासन त्याने त्या मातेला दिले. या भावनिक आश्वसनावर विश्वास ठेवून महिला त्याच्यासोबत राहण्यास तयार झाली. त्यानंतर दोघे वैजापुरातील खंडोबानगर परिसरात एकत्र राहू लागले. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू होते. परंतु, काही कालावधीनंतर तो तरुण दारूच्या आहारी गेला आणि त्याचे खरे रूप समोर आले.
दारू पिऊन घरी आल्यावर तो विनाकारण महिलेला शिवीगाळ करू लागला. दारूच्या नशेत तिला बेदम मारहाण करणे, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करणे हा त्याचा नित्यक्रम बनला. या वाढत्या त्रासाला आणि छळाला कंटाळून पुढे दोघांनी महिलेच्या आईच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहण्याचे ठिकाण बदलले तरी त्या तरुणाची वर्तणूक सुधारली नाही; उलट त्याचा त्रास अधिकच वाढला.
अखेर या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पीडित महिलेने थेट वैजापूर पोलीस स्टेशन गाठले आणि तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील रखडलेली विकासकामे आणि प्रवाशांना ...
महत्त्वाची खबरदारी:
ही घटना समाजमन सुन्न करणारी आहे. सोशल मीडिया हे संवादाचं प्रभावी साधन असले तरी, ऑनलाईन माध्यमातून झालेली प्रत्येक ओळख ही विश्वासार्ह असेलच असे नाही. त्यामुळे ऑनलाईन नात्यांमध्ये पाऊल ठेवताना किंवा कोणताही भावनिक निर्णय घेताना नागरिकांनी, विशेषतः महिलांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.






