मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विहिरी, तलाव व झरे यांसारख्या पारंपरिक जलस्रोतांचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप नगरसेवक व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे यांनी महापालिकेकडे ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची माहिती घेऊन रविवारच्या प्रवासाचे ...
वाढते शहरीकरण आणि भूजल पातळीतील घट यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि सॅटेलाईट मॅपिंग च्या साहाय्याने जलस्रोतांचे सर्वेक्षण करून अचूक जीपीएस को-ऑर्डिनेट्स निश्चित केले जावेत, जीआयएस आधारित 'डिजिटल वॉटर मॅप' तयार करून सर्व विहिरी व तलावांची माहिती एका व्यासपीठावर आणावी आणि आयओटी सेन्सर्सद्वारे पाण्याच्या पातळीवर व गुणवत्तेवर २४ तास देखरेख ठेवण्यासाठी 'स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग डॅशबोर्ड' विकसित केला जावा, असा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
पक्षात दोन मतप्रवाह असल्याची चर्चा गैरवाजवी https://prahaar.in/2026/08/07/ahilyanagar-crime-news-case-registered-against-the-supervisors-son/ मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच ...
या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बिगर-पिण्याच्या पाण्याचा नियोजनबद्ध वापर वाढेल, भूजल पुनर्भरणाला चालना मिळेल आणि भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात स्थानिक पातळीवर पाण्याचा साठा तात्काळ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत नगरसेवक सीए प्रतीक कर्पे यांनी महापालिका आयुक्तांनी यावर त्वरित धोरण आखून अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.





