१५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये तब्बल १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद आढळल्याने या संपूर्ण गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली हे उच्चस्तरीय पथक गठीत करण्यात आले असून, एका महिन्याच्या आत सविस्तर चौकशी अहवाल सरकारला सादर करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १० जुलै रोजी विधानभवनात पार पडलेल्या आढावा बैठकीत या दोन्ही आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी भाजप आमदार राहुल आहेर यांनी नाशिक जिल्ह्यासह इतर भागांत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहाराचा आणि बोगस दाव्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गृह व सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
Multiple UPI Apps : एकाच मोबाईल नंबरवर चालणार २ किंवा त्याहून अधिक UPI! जाणून घ्या सोपी पद्धत आणि महत्त्वाचे नियम
मुंबई : आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येक व्यक्ती ऑनलाईन पेमेंटसाठी यूपीआय (UPI) चा वापर करत आहे. मात्र, अनेकदा लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो की, ...
Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा
Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस (Coimbatore–Jaipur AC Express) १३ ऑगस्टपासून पुन्हा ...





