पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कमांडोंची उपस्थिती पाहायला मिळाल्याने काही काळ परिसरात उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ही कोणतीही आपत्कालीन घटना नसून सुरक्षा व्यवस्थेची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेले विशेष मॉक ड्रिल असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
माहितीनुसार, जागतिक स्तरावरील आयटी पार्कच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी हे विशेष सराव अभियान राबवण्यात आले. दुपारी 4 वाजता सुरू झालेला हा सराव रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 5 तास सुरू होता. माण-हिंजवडी परिसरातील एका खासगी कंपनीच्या आवारात हा सराव पार पडला. (Security)
जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य ...
या मॉक ड्रिलमध्ये 100 हून अधिक NSG कमांडोंनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत अमेरिकेतील 17 विशेष कमांडोही सहभागी झाले होते. संभाव्य दहशतवादी हल्ला किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांनी किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद द्यावा, याची चाचणी या सरावातून घेण्यात आली.
सरावादरम्यान अत्याधुनिक उपकरणे, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि विविध बचाव तंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, प्रतिसादाची गती आणि कार्यपद्धतीची पडताळणी हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. (Pune News)
हिंजवडी आयटी पार्कमध्ये देश-विदेशातील अनेक मोठ्या आयटी कंपन्यांची कार्यालये असून दररोज हजारो कर्मचारी येथे कामासाठी येतात. त्यामुळे अशा संवेदनशील परिसरात सुरक्षा व्यवस्थेची नियमित तपासणी आणि सराव महत्त्वाचा मानला जातो. ( National Security Guard)
मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA Lottery) उद्या गुरुवारी ६ ऑगस्ट, २०२६ रोजी ...
दरम्यान, परिसरात अचानक मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज कमांडो आणि पोलीस तैनात झाल्याने सुरुवातीला अनेक कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा केवळ सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या मॉक ड्रिलमुळे आयटी पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.






