Wednesday, August 5, 2026

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

Devendra Fadnavis : कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'च्या संकल्पनेला बळ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले पंतप्रधान मोदी व अमित शाह यांना अभिवादन

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० (Article 370) आणि ३५A रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला सात वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दृढ संकल्पामुळे कलम ३७० आणि ३५A हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारताची एकता, अखंडता आणि संवैधानिक समानता अधिक मजबूत झाली.

मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) आणि लडाखमधील नागरिकांसाठी सुशासन, शांतता, समान अधिकार आणि सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. तसेच, 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी नमूद केले.

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढे सांगितले की, कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा आजही राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक समानता आणि सक्षम भारताचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या परिवर्तनकारी निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >