उत्तम कलाकृतींना नेहमीच अमाप प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांना नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. पण आजही मराठी सिनेमांना महाराष्ट्रामध्ये शो करिता मल्टिप्लेक्स मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्पायडरमॅन हा हॉलिवूडचा सिनेमा ३१ जुलै २०२६ रोजी मुंबईसह भारतात प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी मुंबईसह महाराष्ट्रात मल्टिप्लेक्स उपलब्ध आहेत पण मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्ससाठी संघर्ष करावा लागत आहे. याबाबत अभिनेता कुशल बद्रिकेने खंत व्यक्त केली.
या निराश करणाऱ्या वातावरणातून मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा नव्याने उभारी देणारी बातमी आली आहे. एका वर्षामध्ये दोन मराठी सिनेमांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सामाजिक, ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरील सिनेमांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच हॉरर, थ्रिलर आणि विनोदी सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे.
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते ...
एकाच वर्षामध्ये रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजा शिवाजी’ आणि प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद २’ या सिनेमांनी १०० कोटींचा टप्पा पार केला. मराठी प्रेक्षकांनी या सिनेमांना उदंड प्रतिसाद दिला, अगदी महिना उलटून गेल्यानंतरही सिनेमांचे हे शो हाऊसफुल्ल होत होते. मात्र मराठी सिनेमांसाठी शो मिळविण्याकरिता थिएटर मिळत नसल्याची खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स मिळत नाही:
सध्या कुशल बद्रिके हा त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ सिनेमामुळे चर्चेमध्ये आला आहे. कुशलसह सिनेमाची संपूर्ण टीम जोरदार प्रमोशन करीत आहे. सिनेमाची निर्मिती आणि त्याच्या प्रमोशनसाठी टीमकडून अथक प्रयत्न केले जात असूनही चित्रपटगृहांमध्ये मात्र शो मिळत नसल्याची खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.
काय म्हणाला कुशल बद्रिके?
“सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांना ठिकाणच नसतं हे काही मला पटत नाही. हॉलीवूडच्या सिनेमांसाठी ७५० ते १५०० रुपये तिकिटांचा दर लावतात. आणि आम्हाला शोसुद्धा देत नाही. कितीतरी लोकांनी मला अशा प्रकारची समस्या सांगणारे मेसेज केले आहेत. ‘आम्हाला तिकीट बुक करायचं आहे पण शोच दाखवत नाहीये,’ असे प्रेक्षक सांगत असतात,” अशी खंत कुशल बद्रिकेने व्यक्त केली आहे.






