Bus Accident : चालक ठरला देवदूत! २०० फूट खोल दरीच्या उंबरठ्यावर बस! चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

सिंधुदुर्ग : गोवा-पणजीहून वेंगुर्ल्याकडे येणाऱ्या कदंबा वाहतूक महामंडळाच्या बसचा आजगाव-वाघबीळ येथील धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. बस ज्या ठिकाणी कलंडली, तेथून अवघ्या काही अंतरावर सुमारे २०० फूट खोल दरी असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त होत आहे. (Bus Accident)



दुचाकीस्वाराला वाचवताना बस गटारात कलंडली :


गोवा-पणजी येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटलेली पणजी–शिरोडा–वेंगुर्ला (GA 03 X 0249) ही कदंबा बस आजगाव येथे पोहोचली असता समोरून एक चारचाकी वाहन येत होते. त्याचवेळी चारचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बसचालकाने तत्काळ बस डाव्या बाजूला घेतली. या प्रयत्नात बसचा ताबा सुटला आणि ती रस्त्यालगतच्या गटारात कलंडली. (Bus Accident)



क्षणभराचा फरक आणि मोठा अनर्थ टळला :


अपघात ज्या ठिकाणी झाला ते वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. बस आणखी काही फूट पुढे घसरली असती, तर ती थेट २०० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. मात्र चालकाने दाखवलेल्या धाडसामुळे आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली. (Bus Accident)



ग्रामस्थांनी धाव घेत केली मदत :


घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसचे चालक धनंजय आसोलकर आणि वाहक सर्वेश नाईक यांनी शांतपणे परिस्थिती हाताळत सर्व ४५ प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. (Bus Accident)

Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा

Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत

Titamba Ashram School : टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अखेर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून