Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी (२८ जुलै) राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)


गेल्या काही दिवसांपासून राज्यात संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. काही भागांत उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना, अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवसही पावसाची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज आहे.



कोकणात मुसळधार पावसाचा जोर :


कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये हलका ते मध्यम, तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता :


पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)



उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस :


धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.



मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज :


छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



विदर्भात पावसाचा सर्वाधिक प्रभाव :


चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



हवामान विभागाचे नागरिकांना आवाहन :


वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी मेघगर्जनेच्या वेळी शेतातील कामे टाळावीत तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. एकूणच, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा

Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत

Titamba Ashram School : टिटंबा आश्रमशाळेतील विषबाधाप्रकरणी अखेर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती : मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून

MPSC Paper Leak : एमपीएससी' पेपरफुटीच्या आरोपांप्रकरणी आयोग पोलिसांत

- पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध