Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका नाही. पण रात्रीच्या जेवणानंतर चालणे सुद्धा शरीरासाठी तितकेच फायदेशीर असते.


अनेक लोक रात्रीच्या जेवणानंतर TV पाहत बसतात किंवा लगेच झोपतात परंतु, या सवयी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. जेवणानंतर शरीराची हालचाल झाली नाही तर पचनसंस्था मंदावते. ज्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. जेवल्यानंतर लगेच पाठीवर टेकल्यास पोटातील पाचक रस आणि अन्न उलटे अन्ननलिकेत येण्याचा धोका जास्त असतो. याला वैद्यकीय भाषेत ॲसिड रिफ्लेक्स किंवा छातीत जळजळ होणं असं म्हणतात.



रात्रीच्या जेवणानंतर शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अत्यंत वेगाने वाढते. अशावेळी १० ते १५ मिनिटे चालल्यास आपल्या शरीरातील स्नायू रक्तातील ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करू लागतात. यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी साखरेची पातळी नियंत्रणात राहते. प्री-डायबिटीज आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी रात्रीचा हा १५ मिनिटांचा वॉक (walk) एखाद्या औषधासारखा काम करतो.


शतपावली :


रात्रीच्या जेवणानंतर रोज नियमितपणे फक्त १० ते १५ मिनिटे चालल्याने पचन प्रक्रिया वेगाने सुरू होते, पोटाशी संबंधित ९० टक्के आजार दूर राहतात. ॲसिडिटी किंवा अपचन होत नाही. शरीर आतून निरोगी राहते. बरेचं लोक शरीराचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि डिटॉक्स ड्रिंक्स घेतात पण, जेवणानंतर केलेली १० ते १५ मिनिटांची शतपावली (nightwalk) औषधाप्रमाणेच काम करते आणि शरीराला अनके फायदे मिळवून देते.

Comments
Add Comment

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Pro Govinda League 2026 : दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश होणार ? 'प्रो गोविंदा'बाबत मोठी अपडेट

मुंबई : प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाचा १६ ऑगस्ट रोजी दिमाखदार प्रारंभ झाला. भारताच्या टी-२० विश्वचषक

Drugs on Station : रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या कूलरमध्ये नशेची इंजेक्शन

कल्याण : चोरी, नशेखोरांचा उपद्रव आणि विविध गैरप्रकारांमुळे यापूर्वी चर्चेत आलेले कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक

Shravani Somvar : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ यामागची रंजक कहाणी; जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक महत्त्व

मुंबई : श्रावण महिना सुरू झाला की भक्तिमय वातावरणाने मंदिर परिसर आणि घराघरातील वातावरण भारून जाते. भगवान शिवाची

Relationship Tips : प्रियकराने प्रेयसीला नक्की द्याव्यात 'या' 8 गोष्टी

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची