Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय !


हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ३५ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश केला आहे. या सामन्यात १५ वर्षाच्या वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले. त्याने ४९ चेंडूंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर त्याने ८१ धावांची खेळी केली.(Ind vs Zim)






कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत पहिल्याच षटकात १७ धावा ठोकल्या. मात्र मुजरबानीने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडुवर अभिषेकला बाद करत भारताला पहिला झटका दिला. यानंतर वैभव आणि ईशान चांगली भागीदारी केली. भारताने पॉवरप्लेमध्ये ६३ धावा केल्या. वैभवने या सामन्यात आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४९ चेंडुंमध्ये ८१ धावांची स्फोटक खेळी केली. यानंतर ईशान किशनने २९ धावांची , तर कर्णधार श्रेयस अय्यरने १८ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी केली. शेवटी रिंकू सिंहच्या २५ धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारताला झिम्बाब्वेला १९३ धावांचे लक्ष्य देता आले. झिम्बाब्वेसाठी ब्रॅड इव्हान्सनने सर्वाधिक २ बळी घेतले. (Ind vs Zim)




झिम्बाब्वेची खराब सुरुवात


१९३ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. मयंक यादवने पहिल्या चेंडुवर ब्रायन बेनेटला शून्यावर बाद केले. झिम्बाब्वेने लागोपाठ चार विकेट्स गमावल्या. अडचणीत सापडलेल्या झिम्बाब्वेसाठी रायन बर्लने एकाकी झुंज दिली. त्याने ४३ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह नाबाद ५४ धावांची खेळी केली. वेस्ली मढीवेरेने २८ धावांचे योगदान देत त्याला साथ दिली आणि दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. मात्र, वाढत्या आवश्यक धावगतीमुळे झिम्बाब्वेवरील दबाव कायम राहिला.भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत झिम्बाब्वेला मोठी भागीदारी उभारू दिली नाही. मयंक यादवने ३.५ षटकांत २८ धावा देत ३ महत्त्वाचे बळी घेतले. यश ठाकूरने २ बळी मिळवले, तर रवी बिश्नोई आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १५६ एवढीच मजल मारता आली आणि भारताचा ३५ धावांनी शानदार विजय झाला. या विजयासह भारताने झिम्बाब्वे विरुद्धची टी २० सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली.






 

वैभव सूर्यवंशीचे पर्व सुरू


वैभव सूर्यवंशीने या मालिकेच्या तीन सामन्यांत १५१ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यातील त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच त्याला मालिकावीर या पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Rishikant Singh : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऋषिकांत सिंगला रौप्य पदक

ग्लासगो : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले दुसरे पदक मिळवले. ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६०

Ind vs Zim : वैभव सूर्यवंशीचा वादळी खेळी ! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवले इतक्या धावांचे आव्हान

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स

Indian Youth Hockey Team : भारताने एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई चॅम्पियनशिप जिंकली

मस्कत : भारताच्या सब-ज्युनियर पुरुष संघाने पाकिस्तानला ३-१ ने पराभूत करत एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई

Ind vs Zim : तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल ! चार नवीन खेळाडूंचा सामावेश; अशी असेल भारताची प्लेइंग-११

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ९०

Anahat Singh : अनाहत सिंगने इतिहास रचला, पहिल्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश विजेतेपदाला गवसणी

ओटावा : कॅनडातील नायगारा-ऑन-द-लेक येथे झालेल्या २०२६ जागतिक स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिपच्या मुलींच्या