Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून थेट ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे ८०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या वाढीचा लाभ राज्यातील सर्वच भागांना समान प्रमाणात मिळालेला नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील जलस्थिती अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Water Storage)

जूनअखेर राज्यातील धरणांमध्ये केवळ ३२४.५४ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या महिनाभरात धरणांमध्ये ४७८ टीएमसीहून अधिक पाण्याची भर पडली. त्यामुळे राज्याच्या एकूण जलसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. (Water Storage)



पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोयना (६८ टक्के), उजनी (६८ टक्के), भातसा (८७ टक्के), मुळशी (९५ टक्के), डिंभे (८५ टक्के), भंडारदरा (९० टक्के) आणि कन्हेर (९४ टक्के) या धरणांमधील साठा दिलासादायक आहे. (Dam Water Level)

मात्र, छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांची स्थिती अद्यापही समाधानकारक नाही. या विभागातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, राज्यातील महत्त्वाच्या जायकवाडी धरणात फक्त ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनाचे आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.राज्यातील जलसाठ्यात एकूण वाढ झाली असली तरी पावसाचे असमान वितरण लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि प्रभावी जलव्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. (Marathwada Dam)
Comments
Add Comment

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना

Eknath Shinde : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

जनतेच्या दारात दर्जेदार उपचार पोहोचवण्याचा निर्धार मुंबई : “हे सरकार फक्त आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात

Wardha Accident : ट्रॅव्हल्स बसमुळे चिरडून वर्ध्यात तीन मुलींचा जागीच मृत्यू

वर्धा : देशभर स्वातंत्रदिनाचा उत्साह असताना वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मेडिकल

Jalgaon Crime : जळगावात दूध विक्रेत्यांवर ‘एफडीए’चा बडगा, ७ जणांवर कारवाई

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दुधाची मागणी वाढत असताना अनधिकृत विक्री आणि भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध

FDA Raid : ब्लिंकिट, झेप्टो, इन्स्टामार्ट 'एफडीए'च्या रडारवर

- १४ आस्थापनांचे परवाने निलंबित; 'फिल्म सिटी'तील बॉलीवूड कॅफेलाही दंड मुंबई : झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी

Eknath Shinde : ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्र अग्रस्थानी, ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती ठाणे : ८० व्या