Devendra Fadnavis : "तुका म्हणे उगे रहावे..."; म्हणत दिल्लीत जाण्याच्या चर्चांना फडणवीसांनी दिला पूर्णविराम

- दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा फुलस्टॉप! 'जे मिळालंय तेच सर्वोत्तम', समाधानाचा मंत्र"


पंढरपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत जाणार असल्याच्या राजकीय चर्चांना स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पूर्णविराम दिला आहे. "जे दिलंय ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं," असे सांगत आपण सध्याच्या जबाबदारीत पूर्णपणे समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत महत्त्वाची भूमिका स्वीकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.



मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले, "जे मिळालं आहे तेच सर्वोत्तम आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 'तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी' हा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळे मी आजच्या जबाबदारीत पूर्णपणे समाधानी आहे." त्यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील संभाव्य नियुक्तीच्या चर्चांवर विराम लागल्याचे मानले जात आहे.


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम केल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही फडणवीसांनी उत्तर दिले. "पदावर किती वर्षे राहिलो यापेक्षा त्या काळात जनतेसाठी किती काम केले, हे अधिक महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "मी मुख्यमंत्रीपदावर (Devendra Fadnavis) सर्वाधिक काळ राहिलेलो नाही. माझा क्रमांक तिसरा आहे. पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत जनतेची सेवा करत राहणार आहे. त्यांच्या कृपेने पुढेही अनेक चांगली कामे करण्याची संधी मिळेल, असा विश्वास आहे."



दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही "मला महाराष्ट्रातच राहायचे आहे आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार," अशी प्रतिक्रिया देत दिल्लीच्या चर्चांवर भाष्य केले होते. आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनीही आपण सध्याच्या भूमिकेत समाधानी असल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना मोठा विराम मिळाला आहे.




Comments
Add Comment

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत वडूज येथे भव्य तिरंगा रॅली

वडूज, ता. खटाव : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून,

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ अभियानांतर्गत दहिवडी व वडूज येथे तिरंगा रॅली

दहिवडी / वडूज : ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या राष्ट्रभक्तीपर अभियानांतर्गत दहिवडी आणि वडूज येथे तिरंगा रॅलीचे

Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त

Maharashtra Police : राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

मुंबई : पोलीस, कारागृह आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या

Sunetra Pawar : चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक