Saturday, July 25, 2026

Ashadhi Ekdashi 2026 : सलग २० वर्षे वारीचं फळ! धाराशिवच्या माने दांपत्याला विठुरायाच्या महापूजेचा मान

Ashadhi Ekdashi 2026 : सलग २० वर्षे वारीचं फळ! धाराशिवच्या माने दांपत्याला विठुरायाच्या महापूजेचा मान

पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे लाखो वारकऱ्यांच्या (Warkari) उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा (Government Mahapuja) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरातील दर्शन रांगेतील (Darshan Queue) पहिल्या निष्ठावंत वारकरी दांपत्याला मानाच्या वारकऱ्याचा बहुमान देण्यात आला. यंदा हा सन्मान धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने या दांपत्याला मिळाला.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब (Kalamb) तालुक्यातील गौरगाव (Gaurgaon) येथील बाबासाहेब आणि प्रभावती माने हे शेती (Farming) व्यवसाय करतात. गेल्या सलग 20 वर्षांपासून ते मनोभावे पंढरीची वारी करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील ही वारीची तिसरी पिढी (Third Generation) असून विठ्ठल भक्तीची परंपरा त्यांनी जपली आहे.

महापूजेचा मान मिळाल्यानंतर बोलताना माने दांपत्याने आनंद व्यक्त केला. "आम्ही २० वर्षांपासून वारी करत आहोत. आमच्या कुटुंबात वारी करणारी ही तिसरी पिढी आहे. मानाचे वारकरी होण्याचा सन्मान मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आयुष्य कृतार्थ झाले," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बाबासाहेब आणि प्रभावती माने यांना एक मुलगा, चार मुली आणि आठ नातवंडे असा मोठा परिवार आहे. सलग दोन दशकांच्या अखंड वारीमुळे (Pilgrimage) त्यांना यंदा विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) कडून त्यांना एक वर्षासाठी मोफत प्रवास (Free Travel) पासही प्रदान करण्यात आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >