BHARAT TAXI : मुंबई आणि पुणेकरांसाठी 'भारत टॅक्सी' सेवा सुरू; ट्रॅफिक असो किंवा पाऊस, भाडे राहणार निश्चित!

मुंबई: कॅब चालकांची भाडे नाकारण्याची कटकट, पीक अवर्समधील अव्वाच्या सव्वा दर आणि ट्रॅफिक किंवा पावसात होणारी प्रवाशांची आर्थिक पिळवणूक यातून आता सर्वसामान्यांची कायमची सुटका होणार आहे. राज्य सरकारने प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय सुरू करत अधिकृत 'भारत टॅक्सी' (Bharat Taxi) सेवेची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येत असून, सुरुवातीला तब्बल ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले आहे.



एकाच ॲपमध्ये कार, रिक्षा अन् बाईक टॅक्सी


भारत टॅक्सीचे सर्वात मोठे आणि उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे एकाच मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत. ही सेवा पूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. या सेवेचे भाडे अत्यंत आकर्षक आणि निश्चित ठेवण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या १.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी ३१ रुपये भाडे आकारले जाईल, तर त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये दर असणार आहे. त्यामुळे अचानक वाढणाऱ्या भाड्याच्या त्रासापासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.



ना सर्ज प्रायसिंग, ना भाडे नाकारण्याची कटकट


अनेकदा ऑफिसच्या वेळेत किंवा लोकल ट्रेन बंद पडल्यानंतर टॅक्सी बुक करताना प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खाजगी कंपन्या परिस्थितीचा फायदा उचलत 'सर्ज प्रायसिंग'च्या (Surge Pricing) नावाखाली भरमसाठ पैसे उकळतात किंवा अनेकदा चालक भाडे स्वीकारण्यास नकार देतात. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीने सुरू झालेल्या भारत टॅक्सी सेवेमध्ये भाडे पूर्णपणे निश्चित असणार आहे. बाहेर मुसळधार पाऊस असो किंवा रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी, या सेवेच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही.



सहकारी मॉडेल; चालकच असणार कंपनीचे मालक


भारत टॅक्सी ही सेवा केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (NeGD) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यासाठी 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड' या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. खाजगी कंपन्यांच्या व्यावसायिक तुलनेत ही सेवा पूर्णपणे सहकारी संस्थेच्या (Co-operative) माध्यमातून चालवली जाईल. त्यामुळे यात वाहन चालवणारे चालक हे केवळ नाममात्र कर्मचारी नसून ते या संस्थेचे थेट मालक असणार आहेत. यामुळे चालकांना त्यांच्या मेहनतीचा संपूर्ण आणि योग्य मोबदला मिळेल, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.



ॲप कसे डाऊनलोड कराल?


अँड्रॉइड (Android) आणि आयफोन (iPhone) युजर्स आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून 'भारत टॅक्सी' हे मोबाईल ॲप सहज डाऊनलोड करू शकतात. हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक प्रभावीपणे थांबवून त्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि वाजवी दरात प्रवास घडवणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे मुख्य ध्येय आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain : मुंबईत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७६ टक्के पडला पाऊस

मुंबई : मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वर्षभराच्या तुलनेत सरासरी ७५ ते ७६ टक्के एवढ्या पावसाची (Rain) नोंद झाल्याची आकडेवारी

BMC Schools : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ८० टक्के शालेय साहित्याचे वाटप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) शाळांमध्ये (Schools) शालेय विद्यार्थ्यांना (Students) दरवर्षी २७ शैक्षणिक वस्तुंचे मोफत वाटप

BMC : तब्बल १२७८ महिलांमध्ये स्तन कर्करोगाची आढळली लक्षणे, महापालिकेच्यावतीने केला जाणार मोफत उपचार

महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली माहिती मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री

Mumbai Water Supply : मुंबईकरांचा पाणी साठा सुस्थितीत, आता प्रतीक्षा ऑगस्टमधील पावसाची

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून

Ashadhi Ekadashi : वडाळा येथील 'प्रतिपंढरपूर' विठ्ठल मंदिरात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक संपन्न

मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसह महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी विठुरायाच्या चरणी प्रार्थना वडाळा : आषाढी

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने