Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये वर्षांनुवर्षे रेंगाळलेल्या जमिनीच्या महसुली दाव्यांचा त्वरित आणि कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. क्रान्तिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केली.



महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (एसडीओ), उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जमिनींशी संबंधित हजारो दावे प्रलंबित आहेत. एखाद्या प्रकरणात निकाल लागला तरी असंतुष्ट पक्षकार वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाया जातो आणि प्रशासनावरील ताण वाढतो. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या 'महसूल लोक अदालत' उपक्रमाला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे पुणे पॅटर्नच्या धर्तीवर आता संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जाणार आहे.



या अभियानांतर्गत मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरांवर दर तीन महिन्यांतून एकदा महसूल लोक अदालतीचे आयोजन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या पक्षकारांचा महसुली दावा किंवा अपील प्रलंबित आहे, ते दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील 'प्रपत्र-अ' मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करू शकतील. प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही बाजूंची संमती निश्चित केली जाईल आणि कायदेशीर तडजोडनामा तयार केला जाईल. त्यानंतर निश्चित केलेल्या लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या संमतीने अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढले जाईल.



या अभियानाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व महसुली कार्यालयांच्या संकेतस्थळांवर आणि दर्शनी भागात माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पक्षकारांना नोटिसा जारी करणे, तडजोड अर्ज स्वीकारणे आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी दर तीन महिन्यांनी या अभियानाचा आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात

Train MegaBlock : पश्चिम रेल्वेचा वीकेंडला बोरिवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक; गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर

मुंबई: