Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार पुनरागमन, पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार; शेतकऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने अचानक ओढ दिल्याने निर्माण झालेली चिंतेची स्थिती आता निवळण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यापासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून, देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.



गेल्या काही आठवड्यांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अनेक शहरांत उष्णता आणि दमटपणा वाढला होता. प्रत्यक्ष तापमानापेक्षा 'फिलिंग हॉट' (जास्त उकाडा) जाणवल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आता मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या प्रणालीमुळे समुद्रातील ओलावा मोठ्या प्रमाणात जमिनीच्या दिशेने सरकणार असून, ढगांची निर्मिती वाढणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा जो पट्टा हिमालयाच्या दिशेने सरकला होता, तो आता पुन्हा दक्षिणेकडे स्थिरावत असल्याने मध्य आणि मैदानी भागांत पावसाची स्थिती सुधारणार आहे.



ईशान्य भारतापासून सुरुवात
मान्सूनच्या या नव्या टप्प्याची सुरुवात ईशान्य भारतापासून होणार असून, त्यानंतर पूर्व, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाचा जोर वाढेल. काही भागांत मुसळधार सरी, तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे हवेतील दमटपणा कमी होऊन तापमानात घट होण्यास मदत होईल. यंदा जुलैमध्ये पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने शेतीवर त्याचा परिणाम झाला होता. भात, सोयाबीन, कापूस आणि कडधान्यांच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुनरागमन करणारा हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरेल. मात्र, एका आठवड्याच्या पावसाने संपूर्ण हंगामातील तूट भरून निघणार नाही, असेही तज्ज्ञांचे मत आहे.



ऑगस्टकडे शेतकऱ्यांचे लक्ष
पावसाचा हंगाम समाधानकारक राहण्यासाठी ऑगस्ट महिन्यातही सातत्याने चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. तेव्हाच जलसाठे वाढतील आणि कृषी क्षेत्राला दिलासा मिळेल. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील काही दिवसांतील हवामानाच्या बदलांकडे लागले असून, मान्सूनच्या या सक्रियतेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक