Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. (Sunetra Pawar)


अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्य, उपचार आणि मदतकार्याबाबत तातडीच्या सूचना दिल्या. त्यांनी पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमी वारकऱ्यांना तात्काळ आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत तसेच आवश्यक ती सर्व मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. (Sunetra Pawar)



राज्य सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे - सुनेत्रा पवार


यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबीयांना धीर दिला. राज्य सरकार मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांसह आणि जखमींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Sunetra Pawar)



जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी :


या दुर्घटनेबाबत सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हटले की, "आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे." अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. (Sunetra Pawar)



वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी :


"पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वाहनचालकांनी पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी," असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. दरम्यान, प्रशासनाकडून अपघाताची चौकशी सुरू असून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Sunetra Pawar)




Comments
Add Comment

Jejuri Palkhi Accident : जेजुरी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन

Asmita Katkar death case : मुलगा होईल म्हणून कपडे घेतले आणि...; अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! आई-वडिलांचे सासरच्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा

Ashadhi Wari 2026 : वारीत वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयामुळे २ परिचारिकांना विषबाधा; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई

धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी