Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत ३ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. (Sunetra Pawar)


अपघाताची माहिती मिळताच सुनेत्रा पवार यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बचावकार्य, उपचार आणि मदतकार्याबाबत तातडीच्या सूचना दिल्या. त्यांनी पालखी प्रमुख, पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. जखमी वारकऱ्यांना तात्काळ आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत तसेच आवश्यक ती सर्व मदत तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. (Sunetra Pawar)



राज्य सरकार वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे - सुनेत्रा पवार


यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या जखमी वारकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करत कुटुंबीयांना धीर दिला. राज्य सरकार मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांसह आणि जखमींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Sunetra Pawar)



जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी :


या दुर्घटनेबाबत सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत म्हटले की, "आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे." अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. (Sunetra Pawar)



वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी :


"पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. वाहनचालकांनी पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी," असे आवाहनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. दरम्यान, प्रशासनाकडून अपघाताची चौकशी सुरू असून वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Sunetra Pawar)




Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील