लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आणि संबंधिता विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात रेणापूर पोलिसांनी चोरीचा आरोप असलेल्या अल्पवयीन मुलांविरुद्ध तसेच मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल केले आहेत.(Latur News)
मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात मानसिक छळ व कौटुंबिक अत्याचाराचे ...
मिळालेल्या माहितीनुसार, खरोळा येथील गट क्रमांक ४५० मध्ये शेतकरी नारायण राऊतराव यांची शेती आहे. या परिसरात अनेक दिवसांपासून इलेक्ट्रिक मोटारी, बोअरच्या केबल वायर तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरीला जात असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास तीन अल्पवयीन मुले शेतातील पाणबुडी मोटार व बोअरचे केबल वायर घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या मदतीने या तिघांना पकडण्यात आले. या प्रकरणी सुमारे १६ हजार रुपयांच्या साहित्य चोरीची तक्रार नारायण राऊतराव यांनी रेणापूर पोलिसांत दिली असून, त्यावरून अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Viral Video)
राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना प्राधान्य ३ आरोबी, ४ सबवे व अंडरब्रिजचे ...
मात्र, पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वीच संबंधित मुलांना लोखंडी खांबाला बांधून पाईप व वायरने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत तिन्ही मुले जखमी झाली. मुलांना खांबाला बांधून त्यांच्या पाठीवर, पायांवर आणि मांडीवर मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.
या प्रकरणी सचिन राऊतराव आणि नितीन शिंदे (रा. खरोळा) यांच्याविरुद्ध रेणापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या आरोपाखाली अल्पवयीन मुलांविरुद्ध आणि मारहाणीप्रकरणी संबंधित शेतकऱ्यांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रेणापूर पोलीस करत आहेत.(Crime News)






