Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर


नवी दिल्ली : शहरातील सतत वाढत्या तापमानामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त होत आहे. यात देशातील १४ शहरांचा समावेश असून महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांचाही समावेश आहे. विशेष जगात उष्णतेचा धोका असलेल्या शहरांमध्ये राज्यातील दोन शहरे असून एक तर दिवसाच्या उष्णतेनंतर, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे संध्याकाळी थंड वाऱ्यामुळे आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.जगातील २०५ सर्वात मोठ्या शहरांच्या विश्लेषणानुसार भारत,(India) पाकिस्तान,(Pakisthan) नायजेरिया आणि घाना या देशांमध्ये तीव्र उष्णतेच्या धोक्याची सर्वाधिक शहरे आहेत. सर्वाधिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत जयपूरसारखी प्रमुख पर्यटनस्थळे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रांचाही समावेश असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.



‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, तीव्र उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने इराकमधील अल बसरा हे शहर जगात प्रथम, तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. या अभ्यासात पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना सर्वाधिक धोका असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधक व अभ्यासाच्या प्रमुख लेखिका नेथमी जयरत्ने करियावासम यांनी सांगितले की, लोकसंख्येची असुरक्षितता, मर्यादित आरोग्य सुविधा, आर्थिक परिस्थिती आणि उष्णतेशी सामना करण्याची कमी क्षमता यांसारखे घटकही धोका वाढवितात.



५० सर्वाधिक धोकादायक शहरांमध्ये भारतातील १४ शहरांचा समावेश असून, त्यात महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे, तामिळनाडूतील मदुराई आणि चेन्नई, कर्नाटकमधील बंगळुरू, तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनौ यांचा समावेश आहे. सर्वाधिक धोक्याची ९५ टक्क्यांहून अधिक शहरे दक्षिण, आग्नेय आशिया आणि सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिकन प्रदेशात आहेत.


या अभ्यासात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे विश्लेषण करण्यात आले. नागरिकांचे वय, आर्थिक स्थिती, वातानुकूलन सुविधा, तसेच झाडे आणि हरित क्षेत्र यांसारख्या नैसर्गिक संरक्षण व्यवस्थेचा विचार करून उष्णतेच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यात आले. या संशोधनाच्या सह-मार्गदर्शक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक राधिका खोसला यांनी सांगितले की, जगभरात वातानुकूलन यंत्रांच्या मागणीत वाढ होत असली तरी अनेकांना ती परवडत नाही. शिवाय, ऊर्जा वापरावर आधारित शीतकरण व्यवस्थेवर अतिनिर्भरता वाढल्यास जागतिक तापमानवाढ आणखी वेगाने होण्याचा धोका होऊ शकतो.

Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

PM Narendra Modi : 'ही घटना अत्यंत दुःखद...' व्हिएतनाम बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील 'फू क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर

Vietnam Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाम बोट दुर्घटनेत २१ जणांना वाचवण्यात यश, १५ भारतीयांचा मृत्यू; दूतावासाकडून तातडीची मदत

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील (Vietnam boat accident)अतिशय लोकप्रिय अशा 'फू क्वोक' (Phu Quoc) बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर

bus conductor arrested mangaluru : "मागच्या सीटवर या..." चालत्या बसमध्ये विद्यार्थिनींसमोर विकृत कंडक्टरचे अश्लील कृत्य; मंगळुरूतील घृणास्पद कृती!

मंगळुरू : कर्नाटकच्या (Karnatak) मंगळुरू (Mangluru) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे

Kerala Boy Dies After Anaesthesia : साध्या जखमेवर भूल दिली अन् १८ महिन्यांच्या चिमुकल्याला हृदयविकाराचा झटका; केरळमधील संतापजनक घटना

केरळ : केरळच्या कन्नूर (Keral Kannur) जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला आणि पालकांना हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक