Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार असून, या गाडीमध्ये तब्बल २२ पैकी ११ जनरल डबे असल्याने आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसच्या (Amrit Bharat Express) फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यास मंजुरी दिली आहे.



रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान


आतापर्यंत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र गुरुवारपासून ही सेवा दैनिक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील हजारो कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी उधना, सुरत आणि परिसरातील औद्योगिक भागात ये-जा करतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस (Amrit Bharat Express) जी सध्या उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटते, ती आता दररोज सकाळी ७.१० वाजता उधना येथून सुटेल.


त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस जी सध्या ब्रह्मपूर येथून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटते, ती देखील आता दररोज रात्री ११.४५ वाजता ब्रह्मपूर येथून सुटेल. ही गाडी नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि नागपूर मार्गे धावत असल्याने खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळाली आहे. केवळ कामगारच नव्हे, तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.



असे आहे दोन्ही बाजूचे वेळापत्रक


१९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून दररोज सकाळी ७.१० वाजता सुटल्यानंतर वाटेत नवापूर स्थानकावर ८.२८ वाजता, नंदुरबार स्थानकावर ९.३५ वाजता, दोंडाईचा स्थानकावर १०.०३ वाजता, शिंदखेडा स्थानकावर १०.२३ वाजता, अमळनेर स्थानकावर ११.०३ वाजता, धरणगाव स्थानकावर ११.३८ वाजता, जळगाव स्थानकावर दुपारी १२.३२ आणि भुसावळ स्थानकावर दुपारी १ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ब्रम्हपूर येथून दररोज रात्री ११.४५ वाजता सुटल्यानंतर वाटेत भुसावळ स्थानकावर तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता, जळगाव स्थानकावर २.३८ वाजता, धरणगाव स्थानकावर ३.३० वाजता, अमळनेर स्थानकावर ३.४८ वाजता, शिंदखेडा स्थानकावर ४.२३ वाजता, दोंडाईचा स्थानकावर ४.४३ वाजता, नंदुरबार स्थानकावर ५.२५ वाजता आणि नवापूर स्थानकावर सकाळी ६.२६ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल.


दरम्यान, या गाडीला दररोज सुरू करण्यासाठी धरणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्याने खान्देशातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने

Ladki Bahin Yojana : अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींच्या निधी वसुलीबाबत अनास्था?

- माहिती अधिकारातून समोर; ९२ लाख लाभार्थी वगळल्याने वार्षिक खर्च २९ हजार ८१९ कोटींवर मुंबई : राज्य शासनाच्या

Junnar Crime : जुन्नर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 5.5 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा काय आहे निकाल...

 Deepali Chavan Suicide : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू

Jalgaon Crime : वहिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, विरोध केल्याने वहिनीची हत्या

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली होती. नियत फिरलेल्या दिराने वहिनीवरच अत्याचाराचा प्रयत्न

Baramati News : 'जरा बारामतीकडे लक्ष द्या, दादा जाताच...' पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र व्हायरल

बारामती : बारामतीतील विविध समस्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर एक कथित खुलं पत्र