Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार असून, या गाडीमध्ये तब्बल २२ पैकी ११ जनरल डबे असल्याने आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसच्या (Amrit Bharat Express) फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यास मंजुरी दिली आहे.



रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान


आतापर्यंत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र गुरुवारपासून ही सेवा दैनिक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील हजारो कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी उधना, सुरत आणि परिसरातील औद्योगिक भागात ये-जा करतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस (Amrit Bharat Express) जी सध्या उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटते, ती आता दररोज सकाळी ७.१० वाजता उधना येथून सुटेल.


त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस जी सध्या ब्रह्मपूर येथून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटते, ती देखील आता दररोज रात्री ११.४५ वाजता ब्रह्मपूर येथून सुटेल. ही गाडी नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि नागपूर मार्गे धावत असल्याने खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळाली आहे. केवळ कामगारच नव्हे, तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.



असे आहे दोन्ही बाजूचे वेळापत्रक


१९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून दररोज सकाळी ७.१० वाजता सुटल्यानंतर वाटेत नवापूर स्थानकावर ८.२८ वाजता, नंदुरबार स्थानकावर ९.३५ वाजता, दोंडाईचा स्थानकावर १०.०३ वाजता, शिंदखेडा स्थानकावर १०.२३ वाजता, अमळनेर स्थानकावर ११.०३ वाजता, धरणगाव स्थानकावर ११.३८ वाजता, जळगाव स्थानकावर दुपारी १२.३२ आणि भुसावळ स्थानकावर दुपारी १ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ब्रम्हपूर येथून दररोज रात्री ११.४५ वाजता सुटल्यानंतर वाटेत भुसावळ स्थानकावर तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता, जळगाव स्थानकावर २.३८ वाजता, धरणगाव स्थानकावर ३.३० वाजता, अमळनेर स्थानकावर ३.४८ वाजता, शिंदखेडा स्थानकावर ४.२३ वाजता, दोंडाईचा स्थानकावर ४.४३ वाजता, नंदुरबार स्थानकावर ५.२५ वाजता आणि नवापूर स्थानकावर सकाळी ६.२६ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल.


दरम्यान, या गाडीला दररोज सुरू करण्यासाठी धरणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्याने खान्देशातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Kolhapur News : किळसवाणा प्रकार! हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर; खवय्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

कोल्हापूर : अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते, पण याच अन्नाच्या नावाने नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ खेळणारा एक

FDA action in Jalgaon : छापील कागदांमध्ये वडापाव विकणे पडले महागात ! ‘एफडीए’ची कारवाई

FDA action in Jalgaon : राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यात ‘एफडीए’ने कारवाई करत

Lohagad Fort : ऐतिहासिक लोहगडावर पर्यटकांचा धक्कादायक प्रकार; व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संताप

पुणे : लोहगड (Lohagad Fort) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर या ऐतिहासिक किल्ल्याकडे

Road Accident : गुरुपौर्णिमेच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला! शिर्डीहून येणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; २ ठार, २३ जण जखमी

धाराशिव : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला.

Parth Pawar-Kainat Dhar : मान्यवरांच्या उपस्थितीत पार्थ पवार-कायनात दारा यांचा दिमाखदार साखरपुडा संपन्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा (Parth Pawar-Kainat Dhar) यांचा साखरपुडा गुरुवारी

Mumbai Pune Railway : मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत; २३ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर मध्य रेल्वेचे मोठे यश

मुंबई : अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेला मुंबई-पुणे रेल्वे संपर्क अखेर पूर्णपणे पूर्ववत करण्यात मध्य रेल्वेला यश