Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार असून, या गाडीमध्ये तब्बल २२ पैकी ११ जनरल डबे असल्याने आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १९०२१/१९०२२ उधना–ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेसच्या (Amrit Bharat Express) फेऱ्यांची वारंवारता वाढवण्यास मंजुरी दिली आहे.



रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान


आतापर्यंत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. मात्र गुरुवारपासून ही सेवा दैनिक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील हजारो कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी उधना, सुरत आणि परिसरातील औद्योगिक भागात ये-जा करतात. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस (Amrit Bharat Express) जी सध्या उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटते, ती आता दररोज सकाळी ७.१० वाजता उधना येथून सुटेल.


त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस जी सध्या ब्रह्मपूर येथून सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सुटते, ती देखील आता दररोज रात्री ११.४५ वाजता ब्रह्मपूर येथून सुटेल. ही गाडी नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ आणि नागपूर मार्गे धावत असल्याने खान्देश आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या शहरांना थेट जोडणी मिळाली आहे. केवळ कामगारच नव्हे, तर विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.



असे आहे दोन्ही बाजूचे वेळापत्रक


१९०२१ उधना–ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून दररोज सकाळी ७.१० वाजता सुटल्यानंतर वाटेत नवापूर स्थानकावर ८.२८ वाजता, नंदुरबार स्थानकावर ९.३५ वाजता, दोंडाईचा स्थानकावर १०.०३ वाजता, शिंदखेडा स्थानकावर १०.२३ वाजता, अमळनेर स्थानकावर ११.०३ वाजता, धरणगाव स्थानकावर ११.३८ वाजता, जळगाव स्थानकावर दुपारी १२.३२ आणि भुसावळ स्थानकावर दुपारी १ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल. त्याचप्रमाणे १९०२२ ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस ब्रम्हपूर येथून दररोज रात्री ११.४५ वाजता सुटल्यानंतर वाटेत भुसावळ स्थानकावर तिसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता, जळगाव स्थानकावर २.३८ वाजता, धरणगाव स्थानकावर ३.३० वाजता, अमळनेर स्थानकावर ३.४८ वाजता, शिंदखेडा स्थानकावर ४.२३ वाजता, दोंडाईचा स्थानकावर ४.४३ वाजता, नंदुरबार स्थानकावर ५.२५ वाजता आणि नवापूर स्थानकावर सकाळी ६.२६ वाजता पोहचल्यानंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ होईल.


दरम्यान, या गाडीला दररोज सुरू करण्यासाठी धरणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर रेल्वे मंत्रालयाने त्यास मंजुरी दिल्याने खान्देशातील रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Add Comment

Veer Jeevaji Mahale : प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; प्रथम टप्प्यात 1 कोटींचा निधी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Hingoli News : घटस्फोट न घेताच पोलीस कर्मचाऱ्याचे दुसरे लग्न; रोखण्यासाठी आलेल्या पत्नीला बेदम मारहाण

हिंगोली : पोलीस कर्मचाऱ्यानेच कायद्याचे उल्लंघन (Violation of Law) केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे

Pune Maval Landslide : पुण्यात मावळमध्ये दरड कोसळून घर गाडले; 9 जणांची सुटका,युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याच्या

Pune-Mumbai Ghat : पुणे-मुंबई घाट विभागातील रेल्वे दुरुस्ती युद्धपातळीवर; एक मार्ग सुरू, दोन लोकोमोटिव्हसह धावणार गाड्या

पुणे-मुंबई घाट विभागातील (Pune-Mumbai Ghat Section) रेल्वे मार्गाच्या (Railway Line) दुरुस्तीच्या (Restoration Works) कामांचा रेल्वेमंत्री अश्विनी

Ashadhi Wari 2026 : विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; वारीच्या वाटेवर प्रशासनाने उभारली खास सुविधा

 Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पुणे जिल्ह्यातून पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. या वारकऱ्यांच्या

IAS : राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला (Administrative System) अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय