Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.


मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा साठा अंदाजे ४० दिवसांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर अद्याप सुरु असलेली १० टक्के पाणीकपात बंद होण्याची शक्यता आहे. परंतु जोपर्यंत सातही जलाशय भरत नाहीत तोपर्यंत १० टक्के पाणी कपात सुरूच राहील, असे बीएमसीने स्पष्ट केले आहे. जुलै महिनाअखेरीस पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाणार आहे.



गेल्या आठ दिवसांपासून तीही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला न्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे सहा टक्क्यांपर्यंत घटलेल्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे नाशिक जिल्ह्यात येत असून, इगतपुरी येथे मुसळधार पाऊस बरसत आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस झाल्यास जलसाठ्यात झपाट्याने वाढ होईल, असा विश्वास पालिकेच्या जल अभियंता विभागाने स्पष्ट केला आहे.(Mumbai)



तुळशी, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात घरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत ८ जुलैला पाच लाख ९८ हजार ५८९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू राहिली तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल आणि मुंबईवरील पाणी कपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.(Monsoon Update)

Comments
Add Comment

FDA : तुकाराम मुंढेंविरुद्ध अधिकाऱ्यांची मंत्री झिरवळ यांच्याकडे तक्रार

कार्यपद्धतीवर आक्षेप; २५ हून अधिक कर्मचाऱ्यांचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना पत्र मुंबई : अन्न व औषध प्रशासन

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात

मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक

Mumbai High Court - FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाने किती सरकारी कँटीनवर धाडी टाकल्या? अन्न व औषध प्रशासन मंडळाच्या धडक कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे!

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सवाल

The Koyna Dam : कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार

मुंबई : पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे

Chandrashekar Bawankule : मुंबई आणि पुण्यातील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घर

वगळलेल्या भागातील बांधकामांचे सर्वेक्षण होणार; कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन मुंबई :

Junk Food Ban : शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांचा समावेश असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर बंदी; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि त्यांना लहान वयातच लठ्ठपणा तसेच विविध