Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यांत पावसाचा धोका कायम असून, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (९ जुलै) 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.



पुणे आणि सातारा(Pune - Satara) घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील ढगांची संख्या कमी झाल्यामुळे, पुढील काही दिवसांत उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आता पाऊस प्रामुख्याने स्थानिक हवामानानुसार पडेल. गेल्या २४ तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड होता. अनेक ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावरील ताम्हिणी (५३० मिमी) येथे झाला. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३२ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्वरमध्ये नीचांकी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.



सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते ईशान्येकडे सरकत आहे. याशिवाय, नैर्ऋत्य राजस्थान ते बांगलादेश असा एक कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात आणि केरळ किनारपट्टीवरही कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याने राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण अजूनही कायम आहे.



हवामान विभागाने घाटमाथ्यावरील रहिवाशांना आणि डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला

Nitesh Rane : जळगाव जामोदमध्ये फिशिंग क्लस्टर उभारणीसाठी सकारात्मक प्रयत्न; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक फिशिंग क्लस्टर विकसित

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 'स्वयंपूर्ण सिंधुदुर्ग' संकल्पना; मंत्री नितेश राणे यांच्या दालनात सादरीकरण

- शासकीय लाभ १०० टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार मुंबई : केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि